बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतल्यानं भारताची अवस्था दोन बाद 21 अशी केविलवाणी होती. त्या परिस्थितीत फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकनं 77 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 94 धावांची खेळी उभारली.
कार्तिकने शिखर धवनच्या साथीनं 100 धावांची आणि केदार जाधवच्या साथीनं 75 धावांची भागीदारीही रचली. त्यामुळं भारताला दोन बाद 21 धावांवरून सात बाद 324 धावांची मजल मारता आली.
या कामगिरीनंतर दिनेश कार्तिकचं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघातलं स्थान पक्कं मानलं जात आहे.
पहिल्या सराव सामन्यात नऊ चेंडूंत भोपळाही न फोडता आल्यानं कार्तिक थोडा निराश होता. त्यामुळं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मी ती अखेरची संधी समजून फलंदाजीला उतरतो होतो, असं कार्तिकनं सांगितलं.