आयपीएलच्या या सामन्यात दिल्लीला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती. श्रेयस अय्यरनं मुजीबला षटकार ठोकण्याचा केलेला प्रयत्न लॉन्ग ऑफ सीमारेषेवर अॅरॉन फिन्चच्या हातात झेल देणारा ठरला.
या सामन्यात पंजाबनं दिल्लीला विजयासाठी अवघं १४४ धावांचं आव्हान दिलं होतं. श्रेयस अय्यरनं पाच चौकार आणि एका षटकारासह ५७ धावांची झुंजार खेळी उभारली. पण पंजाबच्या प्रभावी आक्रमणासमोर दिल्लीला आठ बाद १३९ धावांचीच मजल मारता आली.