भुवनेश्वरच्या या विक्रमी कामगिरीनं पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 28 धावांनी विजय मिळवला. याआधी भुवनेश्वरनं कसोटीत चार वेळा आणि एका वन डेत पाच फलंदाजांना माघारी धाडण्याची कामगिरी केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी केवळ पाच गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. यात लसिथ मलिंगा, अजंता मेंडिस, उमर गुल, इमरान ताहीर आणि टिम साउथी यांचा समावेश आहे.