IND W vs AUS W World Cup : महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयसाठी 278 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने दमदार सुरुवात केली आहे. 17 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 111 धावा झाल्या आहेत. राहेल हेन्स आणि अलिसा हिली यांनी चांगली सुरुवात केली आहे. सध्या अलिसा हिलीचे अर्धशतक पूर्ण झाले आहे तर राहेल हेन्स 40 धावांवर खेळत आहे.


दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 277 धावा केल्या आहे. सात गड्यांच्या मोबदल्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासमोर 278 धांवाचे लक्ष्य ठेवले आहे. या 277 धावांमध्ये यस्तिका भाटिया, मिथाली राज आणि हरमनप्रीत कौर या तिघींनी अर्धशतकी खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने 278 धांवाचे लक्ष्य ठेवले आहे. एका क्षणी भारतीय संघाने 6 षटकांत केवळ 28 धावांत शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मिताली राज आणि यस्तिका भाटिया यांनी तिसऱ्या विकेटसाठी 25.4 षटकांत 130 धावांची भागीदारी केली. मिताली राजने 96 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 68 धावा केल्या. यास्तिका भाटियाने 83 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या. 


आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी एवढी चांगली राहिली नाही. भारताच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव आहेत. या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले नाही. भारताला अजून तीन लीग सामने खेळायचे आहेत. आघाडीच्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास भारतीय महिला संघाला कामगिरी उंचवावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चारही सामने जिंकले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: