Tushar Deshpande in Ranji Trophy : मुंबईने रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामात धमाकेदार सुरुवात केली. कर्णधार शार्दूल ठाकुरच्या नेतृत्वाखाली टीमने जम्मू-कश्मीरला (Mumbai defeated Jammu and Kashmir) 35 धावांनी पराभूत केले. पण या सामन्याआधी एक मोठी घटना घडली. मुंबईचा अनुभवी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे मैदानात फक्त 10 सेकंदांसाठी बेशुद्ध पडला, ज्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याने हार मानली नाही आणि उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला.

Continues below advertisement

तुषार देशपांडे अचानक पडला बेशुद्ध

या आठवड्यात श्रीनगरमध्ये मुंबई आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यापूर्वी भारतीय वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे अचानक आजारी पडला. तो मैदानावर 10 सेकंदांसाठी बेशुद्ध पडला. त्याला ताबडतोब मैदानाबाहेर स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि ब्राँकायटिसचा त्रास वाढल्याबद्दल उपचार करण्यात आले. पण 30 वर्षीय गोलंदाजाने धैर्य दाखवून मैदानात परत येत 35 ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या, ज्यामुळे मुंबईला पहिल्या डावात 61 धावांची आघाडी मिळाली आणि अखेरीस 35 धावांनी विजय मिळवला.

Continues below advertisement

तुषार देशपांडे म्हणाला की, “हा माझ्यासाठी आणि टीमसाठी एक महत्वाचा सामना होता. मागील हंगामात जम्मू-कश्मीरने आम्हाला पराभूत केले होते, त्यामुळे हंगामाची सुरुवात जोरदार करायची होती. मैदानावर 10 सेकंदांसाठी बेशुद्ध झालो, पण टीमसाठी खेळायची इच्छा मला घाबरू दिलं नाही.” या विजयासह मुंबईने सहा गुण मिळवले, तर जम्मू आणि काश्मीर पराभूत झाला आणि पॉइंट टेबलमध्ये त्यांचे खाते उघडू शकला नाही.

सामन्यात काय घडलं?

चार दिवसांच्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी, जम्मू आणि काश्मीरने सात षटकांत एक गडी गमावून 21 धावांवर आपला डाव सुरू केला आणि 64.4 षटकांत 207 धावांवर सर्वबाद झाला. यापूर्वी, मुंबईने दुसऱ्या डावात 181 धावा आणि पहिल्या डावात 61 धावांची आघाडी मिळवून जम्मू आणि काश्मीरसाठी 243 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जम्मू आणि काश्मीरकडून कामरान इक्बालने शानदार फलंदाजी केली आणि 107 चेंडूत पाच चौकारांसह 56 धावा केल्या.

आकिब नबीनेही घातक गोलंदाजीसोबत फलंदाजीत पण चांगली कामगिरी केली. त्याने 50 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 37 धावा केल्या. पण, त्याची उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी संघाला पराभवापासून वाचवण्यात प्रभावी ठरली नाही. कर्णधार पारस डोग्राने 54 चेंडूत पाच चौकारांसह 29 धावा केल्या. साहिल लोत्रा ​​याने 29 धावा केल्या आणि आबिद मुश्ताक याने 18 धावा केल्या.

मुंबईकडून शम्स मुलानीने अचूक गोलंदाजी केली आणि 20.4 षटकांत 46 धावा देत सात बळी घेतले. शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि तनुश कोटियन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, मुंबईने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात 101.4 षटकांत 386 धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तर जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 75.1 षटकांत 325 धावांवर सर्वबाद झाले.

हे ही वाचा -

Virat Kohli duck for first time in Australia : जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते... ऑस्ट्रेलियन भूमीवर विराट कोहलीसोबत पहिल्या सामन्यात काय घडलं? पाहा Video