India vs Bangladesh Test : बांगलादेशविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्यास अजून वेळ आहे. त्यापूर्वी, काही खेळाडूंना आपला दावा मांडण्याची संधी आहे, त्यापैकी दोन खेळाडू पहिल्या परीक्षेत नापास झाले आहेत. 


कसोटी मालिकेच्या तयारीसाठी बुची बाबू स्पर्धेत भाग घेत असलेला मुंबईचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरला. कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले आहे. या दोन फलंदाजांशिवाय मुंबईचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले.


कोईम्बतूर येथे 27 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सामन्यात मुंबई आणि टीएनसीए-XI आमनेसामने आहेत. टीएनसीए-11 ने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 379 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी मुंबईने पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला पण सलामीवीर दिव्यांश सक्सेना वगळता एकाही फलंदाजाला आपली ताकद दाखवता आली नाही. टीएनसीएचा कर्णधार आर साई किशोरने मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा 8 विकेट गमावून केवळ 181 धावा करता आल्या.


सूर्या-श्रेयसची बॅट शांत 


कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार असलेल्या स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर सर्वाधिक नजरा खिळल्या होत्या. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि अवघ्या 3 चेंडूत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला केवळ 2 धावा करता आल्या. श्रेयस आऊट झाल्यानंतर सूर्या क्रीझवर आला आणि त्याच्याच शैलीत येताच त्याने वेगवान फलंदाजी सुरू केली. त्याच्या आणि दिव्यांशमध्ये 40 धावांची भागीदारी झाली, त्यापैकी 30 धावा सूर्याच्या होत्या. 


खडतर परिस्थितीत अडकलेल्या मुंबईला वाचवून आपली दावेदारी मांडण्याची सुर्याकडे चांगली संधी होती, पण तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याने 38 चेंडूत 30 धावांची खेळी खेळली. याशिवाय युवा फलंदाज मुशीर खानलाही केवळ 16 धावा करता आल्या.


बांगलादेशविरुद्ध होणार पत्ता कट?


हा फक्त पहिला डाव असून या सामन्यात त्याला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळणार आहे. याशिवाय आगामी काळात ते दुलीप ट्रॉफीमध्येही खेळताना दिसणार आहे. म्हणजे निवड समितीवर छाप पाडण्याची त्याच्याकडे अजूनही पुरेशी संधी आहे.