चेन्नई :रविचंद्रन अश्विन 10 वर्षानंतर चेन्नई सुपरकिंग्जमध्ये परतला होता. मात्र, केवळ एक हंगाम खेळल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. चेन्नई सुपरकिंग्जची साथ सोडण्याचा निर्णय आर. अश्विननं घेतला आहे. हा निर्णय अश्विननं चेन्नई सुपरकिंग्जला कळवला आहे.आयपीएल 2025 पूर्वी झालेल्या मेगाऑक्शनपूर्वीचेन्नईनं अश्विनला 9.75 कोटी रुपये मोजत खरेदी केलं होतं.
रविचंद्रन अश्विन यानं आयपीएलकरिअरची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्जकडून केली होती. 2010 ते 2015 पर्यंत चेन्नईचा भाग होता. 2016 ते 2024 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स,पंजाबकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्यानंतर 2025 च्या आयपीएलमध्ये अश्विन पुन्हा चेन्नईच्या संघात दाखल झाला होता.
क्रिकबझच्यारिपोर्टनुसारअश्विननं चेन्नई सुपरकिंग्जपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यानं चेन्नई सुपरकिंग्जला कळवला आहे. मात्र, चेन्नईनं त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे हे समोर आलं नाही.
रिपोर्टनुसाररविचंद्रन अश्विन आता चेन्नई सुपरकिंग्जच्याडायरेक्टर ऑफ ऑपरेशन्सचं पद देखील सोडणार आहे. त्याला गेल्या वर्षी ही जबाबदारी मिळाली आहे.
रिपोर्टनुसार अश्विनच्या मते तो जर इतर फ्रँचायजीसोबत जोडला गेला तर सीएसकेअकॅडमीसोबत त्याचे संबंध अडचणीचे ठरतील. त्यामुळंसीएसकेसह त्यांच्या अकॅडमीसोबत असलेले संबंध देखील तोडण्याचा निर्णय अश्विननं घेतला आहे.
आयपीएलच्या 18 व्या हंगामात अश्विननं चेन्नईकडून केवळ 9 मॅच खेळल्या त्यामध्ये त्याला 7 विकेट मिळाल्या. फलंदाजीचा विचार केला तर तो 9 मॅचमध्ये 33 धावा करु शकला. अश्विनसाठी 2025 चाआयपीएलचा 18 हंगाम खराब ठरला.
रविचंद्रन अश्विन यानं आयपीएलमध्ये221 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं187 विकेट घेतल्या आहेत. या विकेट घेताना त्याचा इकोनॉमी रेट 7.29 इतका आहे. हा रेट टी 20 मध्ये चांगला मानला जातो. आयपीएलमध्ये फलंदाजी करताना अश्विनयानं 833 धावा केल्या होत्या.
दरम्यान, आर. अश्विन यानं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरु असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
चेन्नईची निराशाजनक कामगिरी
आयपीएलचा 18 वा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी निराशाजनक ठरला. गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज शेवटच्या स्थानावर राहिली. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर टीमचं नेतृत्त्व महेंद्रसिंह धोनीला करावं लागलं. मात्र, चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्त्वानंतर देखील फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. आता रविचंद्रन अश्विननं चेन्नईची साथ सोडल्यानंतर तो पुढं कोणत्या भूमिकेत दिसणार किंवा कोणत्या संघाकडून खेळणार याची उत्सुकता आहे.
