Ranji Trophy 2022 Final Live Updates: दुसऱ्या दिवसांचा खेळ संपला, मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर

दिमाखदार सलामीनंतरही मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या Madhya (Pradesh vs Mumbai) पहिल्या दिवशी पाच फलंदाजांना गमावून फक्त 248 धावाच उभारता आल्या.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jun 2022 05:11 PM

पार्श्वभूमी

Ranji Trophy 2022 Final Live Updates: दिमाखदार सलामीनंतरही मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या Madhya (Pradesh vs Mumbai) पहिल्या दिवशी पाच फलंदाजांना गमावून फक्त 248 धावाच उभारता आल्या. या...More

Ranji Trophy 2022 Final: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर

Ranji Trophy 2022 Final Day 2: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं मध्य प्रदेशला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.  मुंबईनं पहिल्या डावात  374 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशच्या संघानं या सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर एक विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. हिमांशू मंत्रीच्या रूपानं मध्य प्रदेशच्या संघाला पहिला धक्का बसलाय. तुषार देशपांडेच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. हिमांशूनं 50 चेंडूत 31 धावा केल्या. मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर आहे.