Continues below advertisement

ICC WTC 2025-2027 Rankings नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची 2025 ते 2027 सुरु आहे. पाकिस्ताननं पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर 93 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं या विजयासह 2025 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा विजेत्या दक्षिण आफ्रिका संघाचा विजयरथ रोखला आहे. पाकिस्तानं या विजयासह डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. नोमान अली यानं दोन्ही डावात मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 10 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 183 धावांवर बाद झाला. या विजयामुळं पाकिस्ताननं थेट गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर, भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. तर, पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. तर, वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकल्यानं भारताच्या रँकिंगमध्ये देखील सुधारणा पाहायला मिळाली.

Continues below advertisement

पाकिस्ताननं जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धा 2025-27 मध्ये पहिली कसोटी खेळली आणि त्यात विजय मिळाल्यानं ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. पाकनं पहिल्या डावात 378 धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्यांचा संघ 167 धावांवर बाद झाला. तर, दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 269 धावा केल्या. पाकिस्तानं दक्षिण आफ्रिकेला 183 धावांवर बाद करत विजय मिळवला.

 चौथ्या स्थानावर असलेल्या भारताचं पॉईंट पर्सेंटेज सुधारलं आहे. भारताचं पॉईंट पर्सेंटेज 61.90 इतकं आहे. तर, भारताच्या वर असलेल्या श्रीलंकेचं पॉईंट पर्सेंटेज 66.67 टक्के असून तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले असून त्यात विजय मिळाल्यानं 36 गुणांसह आणि 100 टक्के पॉईंट पर्सेंटेज सह पहिल्या स्थानावर आहे. तर, श्रीलंकेनं बांगलादेशवर एका सामन्यात विजय मिळाल्यानं भारताच्या वर तिसरा क्रमांक पटकावला आहे.

भारतानं शुभमन गिलच्या नेतृत्त्वात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत 2025-27 मध्ये 7 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी चारमध्ये भारताला विजय मिळाला आहे. तर, दोन मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारत सध्या या रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे. भारत पहिल्या स्थानाच्या दिशेनं कशी झेप घेतो हे पाहावं लागेल.

भारतानंतर इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडनं 2 कसोटी सामने जिंकले आहेत. 2 पराभव आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे. बांगलादेश देखील एक पराभव आणि एक मॅच अनिर्णित राहिल्यानं सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडनं अद्याप खातं उघडलेलं नाही.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत 3 वनडे आणि 5 टी -20 सामने खेळणार आहे. त्यानंतर भारताचे कसोटी सामने पुन्हा सुरु होतील.  आगामी काळात भारत- न्यूझीलंड, भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होईल.