INDvsENG 2nd test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने संयमी खेळी करत लॉर्ड्सच्या मैदानावर अर्धशतक साजरं केलं. यासह भारताकडे सध्या भारताकडे आता 259 धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 6 बाद 181 होती. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऋषभ पंत 22 धावा करुन बाद झाला. त्यानंतर इशांत शर्मा 16 धावांवर आणि रवींद्र जाडेजा 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांना अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद शमी सध्या 52 धावांवर तर जसप्रीत बुमराह 30 धावांवर खेळत आहे.

  


दुसऱ्या डावात भारताकडून अजिंक्य रहाणेने 61, रोहित शर्माने 21, चेतेश्वर पुजाराने 45, विराट कोहलीने 20, ऋषभ पंतने 22 धावा केल्या. तर इंग्लंडकडून मार्क वूडने 3,  ऑली रॉबिन्सनने 2 आणि मोईन अलीने 2 तर सॅम करनने एक विकेट घेतली. 


त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात 391 धावा करत 27 धावांची आघाडी मिळवली होती. यामध्ये कर्णधार जो रूटने 180 धावांची नाबाद खेळी केली. रूटने आपल्या खेळीत 18 चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने 7 चौकारांसह 57 तर रोरी बर्न्सने 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 23 तर मोईन अलीने 27 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या. 


भारताचा पहिला डाव


भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने धडाकेबाज शतक साजरं केले. राहुलने 129 धावांची खेळी केली. यासह भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्या. रोहित शर्माने 83, कर्णधार विराट कोहलीनेही 42 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंतने 37, रवींद्र जाडेजाने 40 धावा केल्या. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 5 विकेट घेतल्या. तर रॉबिन्सनने 2 आणि मोईन अलीने एक विकेट घेतली.