IND vs AUS WTC Final 2023 LIVE : भारताचा पराभव, दुसऱ्यांदा चषकाची हुलकावणी

WTC Final 2023, IND vs AUS : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल सुरु झाली आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 11 Jun 2023 05:15 PM
टीम इंडियाला पुन्हा एकदा अपयश

टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 179 अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव 234 धावांवर आटोपला. आणि ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं.

ऑस्ट्रेलियाचा 209 धावांनी विजय...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरलेय. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी विराट पराभव केला. दुसऱ्या डावात 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 234 धाावंवर आटोपला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट फेकल्या, त्यामुळेच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसलाय. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठी खेळी करता आली नाही.

भारताचा पराभव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये टीम  इंडियाचा पराभव.... 

शिखर भरत बाद, भारताला नववा धक्का

 शिखर भरत बाद, भारताला नववा धक्का
 

भारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल

उमेश यादव एका धावेवर बाद झालाय.. भारताला आठवा धक्का बसलाय.

भारताला सातवा धक्का

भारताला सातवा धक्का बसलाय... शार्दूल ठाकूर बाद झालाय. 

ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकड, अजिंक्य रहाणे तंबूत

ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकड, अजिंक्य रहाणे तंबूत परतलाय. अजिंक्य रहाणे याने चुकीचा फटका मारत विकेट फेकली.

विराट कोहली पाठोपाठ जाडेजाही तंबूत

विराट कोहली पाठोपाठ जाडेजाही तंबूत परतलाय... ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मजबूत केली

भारताला मोठा धक्का

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसलाय. विराट कोहली 49 धावांवर तंबूत परतलाय.

दुखापतीनंतरही अजिंक्य रहाणेची झुंज

अखेरच्या दिवशी करिष्मा होणार का ?

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल चौथ्या दिवसअखेर नाट्यमय वळणावर येऊन उभी ठाकली आहे. ही कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आणखी २८० धावांची आवश्यकता आहे, ऑस्ट्रेलिया विजयापासून सात विकेट्स दूर आहे. या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव आठ बाद २७० धावसंख्येवर घोषित केला. त्यामुळं टीम इंडियासमोर विजयासाठी ४४४ धावांच्या पाठलागाचं कठीण आव्हान आहे. पण भारतीय संघानं चौथ्या दिवसअखेर तीन बाद १६४ धावांची मजल मारून कमाल केली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी विराट कोहली ४४ आणि अजिंक्य रहाणे २० धावांवर खेळत होता. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या आव्हानात जान कायम राखली आहे.

पंचांच्या निर्णायावर शुभमन गिल नाराज

अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी  280 धावांची गरज आहे. 

444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद 71 धावांची भागिदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 44 धावांवर तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत होते. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारत विकेट फेकली. रोहित शर्मा 43 तर चेतेश्वर पुजारा  27 धावांवर बाद झाले. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी  280 धावांची गरज आहे. 

चौथ्या दिवसाचा खेळ संपला

चौथ्या दिवसाचा खेळ संपला. विराट कोहली-अजिंक्य रहाणेची नाबाद अर्धशतकी भागिदारी...

रहाणे-विराटने डाव सावरला

अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीची दमदार फलंदाजी.. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. 

भारताची फलंदाजी ढेपाळली, रोहितनंतर पुजाराही बाद

भारताची फलंदाजी ढेपाळली... रोहित शर्मानंतर चेतेश्वर पुजारा 28 धावांवर बाद झालाय. भारत तीन बाद 93 धावा

टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित शर्मा बाद

टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित शर्मा 43 धावांवर बाद झाला

पुजारा-रोहितची दमदार फलंदाजी

पुजारा-रोहितची दमदार फलंदाजी सुरु आहे. या जोडीने दुसर्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली.

टीम इंडियाचे अर्धशतक

444 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने एका विकेटच्या मोबदल्यात 50 धावांचा पल्ला पार केलाय

भारताला पहिला धक्का, शुभमन गिल बाद

भारताला पहिला धक्का, शुभमन गिल बाद झालाय. 18 धावांवर बोलँडने पाठवले तंबूत

भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 270 धावांवर घोषित केलाय. पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिलेय.  

ऑस्ट्रेलियाने 270 धावांवर डाव घोषित केला... कांगारुंकडे 443 धावांची आघाडी

ऑस्ट्रेलियाने 270 धावांवर डाव घोषित केला... कांगारुंकडे 443  धावांची आघाडी झाली आहे. वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी टीम इंडियाला 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

मिचेल स्टार्कला 41 धावांवर बाद करत शमीने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाकडे 433 धावांची आघाडी

अॅलेक्स कॅरीची विस्फोटक फलंदाजी

अॅलेक्स कॅरी याने दमदार अर्धशतक झळकावलेय. कॅरी आणि मिचेल स्टार्क यांनी अर्धशतकी भागिदारी केली. 

ऑस्ट्रेलियाकडे 400 धावांची आघाडी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलवर ऑस्ट्रेलियाने पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाकडील आघाडी 400 धावांपेक्षा जास्त झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचे सामन्यावर वर्चस्व

ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व प्राप्त केलेय. कांगारुंनी दुसऱ्या डावात 200 धावांचा टप्पा पार केलाय. 

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

कॅमरुन ग्रीनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसलाय. रविंद्र जाडेजाने ग्रीनला केले बाद

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत... चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर मार्नस लाबुशन बाद झालाय.

जाडेजाने हेडचा अडथळा दूर केला

जाडेजाने हेडचा अडथळा दूर केला.. 

शंभरी पार

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तीन विकेटच्या मोबदल्यात 100 धावांपर्यंत मजल मारली आहे. लाबुशेन आणि ट्रेविस हेड मैदानावर आहेत.

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसलाय. जाडेजाने स्मिथला बाद केलेय

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, ख्वाजा बाद

उमेश यादव याने उस्मान ख्वाजाला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिलाय.

दुसऱ्या सत्राचा खेळ संपला

दुसऱ्या सत्राचा खेळ संपलाय.. ऑस्ट्रेलियाला वॉर्नरच्या रुपाने पहिला धक्का बसलाय.. लाबुशेन आणि ख्वाजा मैदानावर आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 196 धावांची आघाडी

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

मोहम्मद सिराजने डेविड वॉर्नरला तंबूत पाठवले.. ऑस्ट्रेलियाला दोन धावांवर पहिला धक्का

भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात

भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात आलाय.. भारतीय संघ173 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताला नववा धक्का

भारताला नववा धक्का बसलाय.. शार्दुल ठाकूर 51 धावांवर बाद

अजिंक्य रहाणे बाद

अजिंक्य रहाणे 89 धावांवर बाद झालाय. तर उमेश यादव पाच धावा काढून तंबूत परतलाय. रहाणे आणि शार्दूलच्या झुंजार फलंदाजीमुळे टीम इंडियाने फॉलोअन टाळलाय.

अजिंक्य रहाणेनं गाजवलं पहिले सत्र

अजिंक्य रहाणे याने पहिले सत्र गाजवले.. रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांनी शतकी भागिदारी केली. रहाणे 89 आणि ठाकूर 36 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 209 धावांनी पिछाडीवर आहे.

मराठमोळ्या फलंदाजांनी सावरला डाव

अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांनी टीम इंडियाचा डाव सावरलाय. अजिंक्य राहणे याने शार्दूल ठाकूरला सोबत घेत धावसंख्या वाढवली. सातव्या विकेटसाठी या दोघांमध्ये 71 धावांची भागिदारी झाली आहे.

टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण

टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. अजिंक्य रहाणेचे दमदार अर्धशतक

अजिंक्यचे अर्धशतक

अजिंक्य रहाणे याने दमदार अर्धशतक झळकावलेय. रहाणे याने आधी जाडेजासोबत भारताच्या डावाला आकार दिला... त्यानंतर आता शार्दूलसोबत धावसंख्या वाढवत आहे.

केस भरत बाद

केएस भरतच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसलाय. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भरतला बोलँडने तंबूत पाठवले. 

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला

जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद १५१ अशी घसरगुंडी उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अजिंक्य रहाणे  धावांवर आणि श्रीकर भरत धावांवर खेळत होते. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं तीन बाद ३२७ धावांवरून पहिल्या डावात सर्व बाद ४६९ धावांची मजल मारली. भारताकडून मोहम्मद सिराजनं १०८ धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. पण भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीला भारतीय फलंदाजांना न्याय देता आला नाही. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजानं ७१ धावांची झुंजार भागीदारी रचली. पण नॅथन लायननं जाडेजाला माघारी धाडून ही जोडी फोडली. त्यामुळं टीम इंडियासमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान २७० धावांची मजल मारण्याची गरज आहे. त्यासाठी टीम इंडियाला अजूनही ११९ धावांची आवश्यकता आहे.

भारताचा अर्धा संघ तंबूत

रविंद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे यांची भागिदारी नॅथन लायन याने संपुष्टात आणली आहे. लायन याने रविंद्र जाडेजा याला 48 धावांवर बाद केलेय. 

जाडेजा-रहाणेची जोडी जमली

अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांची जोडी जमली आहे. दोघांनी 50 धावांची भागिदारी केली आहे.

भारताची 100 धावांपर्यंत मजल

भारताने 100 धावांपर्यंत मजल मारली आहे. अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा सध्या मैदानावर आहेत. 

भारताची फलंदाजी ढेपाळली - 

ऑस्ट्रेलियाने पहिल्याडावात 469 धावांचा डोंगर उभारला.. दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज याने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे काम केले. पण भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना चांगली सुरुवात देता आली नाही. त्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही स्वस्तात तंबूत परतले. झटपट 4 विकेट गमावल्यामुळे टीम इंडिया अडचीत सापडली आहे. 


रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फक्त तीस धावांची सलामी दिली. रोहित शर्मा 15 धावांवर कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. तर शुभमन गिल याला 13 धावांवर बोलँड याने तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारा 14 धावांवर बाद झाला. कॅमरुन ग्रीन याने पुजाराचा अडथळा दूर केला. विराट कोहलीला स्टार्कने बाद केले. विराट कोहली 14 धावांवर बाद झालाय.

विराट कोहली बाद

भारताची फलंदाजी ढेपाळली, विराट कोहलीही तंबूत 

टीम इंडियाची भिंत कोसळली

टीम इंडियाची भिंत कोसळली, पुजारा स्वस्तात बाद झालाय. 

भारताच्या पराभवाची शक्यता जास्त

दुसऱ्या सत्राचा खेळ संपला

ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर रोखल्यानंतर टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा तंबूत परतले आहेत. टीम इंडिया दहा षटकानंतर दोन बाद 37 धावा... विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा खेळत आहेत.

लागोपाठ दुसरा धक्का

रोहित शर्मापाठोपाठ शुभमन गिलह तंबूत परतलाय. गिल 13 धावांवर तंबूत परतलाय... बोलांडने भारताला दिला दुसरा धक्का

भारताला पहिला धक्का

रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसलाय. रोहित शर्मा 15 धावा काढून तंबूत परतलाय. भारत एक बाद 30

अजिंक्य रहाणेचा विक्रम

अजिंक्य रहाणे याने कसोटी क्रिकेटमध्ये 100 झेल घेण्याचा पराक्रम केलाय. 





रोहित-शुभमन फलंदाजीसाठी मैदानात

रोहित-शुभमन फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. रोहित आणि गिल यांनी दमदार सुरुवात केली आहे. 

मोहम्मद सिराजचा विक्रम

मोहम्मद सिराज याने कसोटीत 50 विकेट पूर्ण केल्या आहेत. 





ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला

469 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला

ऑस्ट्रेलियाला नववा धक्का

सिराज आणि रविंद्र जाडेजा यांनी दुसऱ्या सत्रात विकेट घेतल्या... ऑस्ट्रेलियाचे नऊ फलंदाज तंबूत परतले आहेत. 

भारताचा भेदक मारा

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावार भारताने वर्चस्व गाजवलेय. टीम इंडियाच्या गोलंदजांनी चार विकेट घेतल्या आहेत. सिराज, शमी आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तर एका फलंदाजाला धावचीत करण्यात आलेय. ऑस्ट्रेलियाने 400 धावांचा पल्ला पार केलाय. 





ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसलाय... मिचेल स्टार्क धावबाद झालाय. 

ऑस्ट्रेलियाची 400 धावांची मजल

प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 400 धावांचा पल्ला पार केलाय

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसलाय... स्मिथ तंबूत परतला... लॉर्ड शार्दूल ठाकूर याने भारताला सहावे यश मिळवून दिले.

ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के

ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के बसले आहेत... सिराजने ट्रेविस हेडला तंबूत पाठवले तर शमीने ग्रीनचा अडथळा दूर केलाय.

आजच्या दिवसाचा खेळ संपला

जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. लंडनच्या ओव्हल मैदानातल्या या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा पुरेपूर लाभ उठवून ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर तीन बाद ३२७ धावांची मजल मारली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २५१ धावांची अभेद्य भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत नेलं. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी ट्रॅव्हिस हेड १४६ धावांवर आणि स्टीव्ह स्मिथ ९५ धावांवर खेळत होता. भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. 


 

 
हेड ठरला टीम इंडियाच्या डोक्याला ताप


ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगली आहे. ट्रेविस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व मिळवलेय. तीन विकेट झटपट गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला होता. पण स्मिथ आणि हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी केली. ट्रेविस हेड याने शानदार शतक झळकावले आहे, तर स्मिथ याने अर्धशतक झळकावत शतकाकडे वाटचाल केली आहे. सिराज, शमी आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

ट्रेविस हेडचे शतक

ट्रेविस हेडने वादळी शतक झळकावले... 106 चेंडूत 100 धावांची खेळी केली... हेड याचे इंग्लंडमधील पहिले शतक

स्मिथचे दमदार अर्धशतक

स्मिथने दमदार अर्धशतक झळकावलेय. 144 चेंडूत अर्धशतकी खेळीत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले

WTC मध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट कुणाचा ?

ट्रेविस हेड-स्मिथ यांची जोडी जमली, 100 धावांची भागिदारी

ट्रेविस हेड-स्मिथ यांची जोडी जमली आहे. स्मिथने संयमी तर हेडने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला आहे. 175 चेंडूत 100 धावांची भागिदारी करत या जोडीने भारताच्या अडचणी वाढवल्यात.

दुसरे सत्र ट्रेविस हेडने गाजवले

चाहपानासाठी खेळ थांबवण्यात आलाय. दुसऱ्या सत्राचा खेळ ट्रेविस हेड याने गाजवला. हेड याने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवली. हेड याने 75 चेंडूत 10 चौकारांसह 60 धावांची खेळी केली आहे. हेड आणि स्मिथ खेळपट्टीवर आहे. दुसऱ्या सत्रात भारताला फक्त एक विकेट घेण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाने 51 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 170 धावा केल्या आहेत. 

ट्रेविस हेडचे दमदार अर्धशतक

ट्रेविस हेडचे दमदार अर्धशतक... 

ट्रेविस हेडची विस्फोटक फलंदाजी

मध्यक्रम फलंदाज ट्रेविस हेड आक्रमक फलंदाजी करत आहे. हेड  याने 33 चेंडूत 32 धावांचा पाऊस पाडला. स्मिथ 19 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलिया 37 षटकानंतर तीन बाद 125 धावा... 

भारताला मोठं यश

मोहम्मद शमीने भारताला मोठे यश मिळवून दिलेय.. लाबूशन याला 26 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिलाय.

पहिले सत्र संपले

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल ओव्हलवर सुरु आहे. रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. ऑस्ट्रेलियाने 23 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 73 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर याने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिलेय. मोहम्मद सिराज आणि लॉर्ड शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. ख्वाजा याला खातेही उगडता आले नाही. सिराजने ख्वाजाचा अडथळा दूर केला. तर लॉर्ड शार्दूल ठाकूर याने वॉर्नरला बाद केले. लाबूशेन 26 आणि स्मिथ दोन धावांवर खेळत आहे. 

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसलाय... धोकादायक ठरत असलेला डेविड वॉर्नर बाद झालाय. शार्दूल ठाकूर याने 43 धावांवर वॉर्नर याला बाद केलेय. 

लाबुशेन-वॉर्नरची जोडी जमली

लाबुशेन-वॉर्नरची जोडी जमली.... ख्वाजा स्वस्तात बाद झाल्यानंतर या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला... दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली आहे. 

ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना ओव्हलवर श्रद्धांजली, भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात! 

WTC Final 2023, India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर थरार रंगला आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप कोण पटकावणार ? याकडे जगातील सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय. ओव्हल मैदानावर नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या बाजूने पडला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामना सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ओव्हल मैदानावर ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांना  श्रद्धांजली अर्पण केली. एक मिनिटांचे मौन पाळत दोन्ही संघातील खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केली. दोन्ही संघातील खेळाडू मैदानात दंडावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 


ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झालाय. त्याशिवाय एक हजार पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. भारतात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात होय. या दुर्देवी रेल्वे अपघातानंतर अनेक दिग्गजांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. आज भारत आणि ऑस्ठ्रेलियाच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधून रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. 

सिराजने ऑस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का

मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. उस्मान ख्वाजा याला स्वस्तात तंबूत पाठवले. आता डेविड वॉर्नर आणि मार्नस लाबूशेन मैदानावर आहेत. ऑस्ट्रेलियाने 12 षटकानंतर 30 धावा केल्या आहेत. वॉर्नर 17 आणि लाबुशेन 11 धावांवर खेळत आहेत. उस्मान ख्वाज शून्यावर बाद झालाय.

टीम इंडिया 10 वर्षांचा दुष्काळ संपवणार?

गेल्या 10 वर्षांपासून टीम इंडियाने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2013 चॅम्पियन ट्रॉफीवर कब्जा केला होता. तेव्हापासून भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ

डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नश लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, अॅलेक्स कैरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलेंड.


 
भारतीय संघ :

 रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के एस भरत, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज असा संघ मैदानात उतरला आहे.

भारताची प्रथम गोलंदाजी

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपमध्ये (ICC World Test Championship Finals) पहिला कल भारताच्या (Team India) बाजूने लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये रोहित शर्माने टॉस (Toss) जिंकला. भारताने पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

नाणेफेकीचा कौल रोहित शर्माने जिंकला

नाणेफेकीचा कौल रोहित शर्माने जिंकला.... सामना कोण जिंकणार?

पार्श्वभूमी

WTC Final 2023, IND vs AUS : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल सुरु झाली आहे.  टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. याअगोदर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे कसोटी जिंकून टीम इंडिया इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 


दोन्ही संघांमधील सामना 7 जून, बुधवारपासून लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, या मैदानावर ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक सामने खेळले आहेत. तर टीम इंडियानं कांगारुंच्या तुलनेत कमी सामने खेळले आहेत. दरम्यान, दोन्ही संघांचा रेकॉर्ड फारसा खास नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं लंडनच्या ओव्हल ग्राउंडवर 38 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. 


तर टीम इंडियानं 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. अशातच दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियानं 44 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियानं केवळ 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाचं पारडं काहीसं जड आहे. ओव्हल ग्राउंडवर टीम इंडियानं आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियानं विजयाला गवसणी घातली होती. तर, ऑस्ट्रेलियाला 2019 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 


लाईव्ह स्ट्रिमिंग
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. दूरदर्शनवर या सामन्याचे मोफत थेट प्रक्षेपण करणार आहे. याशिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून सामना थेट प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा सामना मोबाईलवरही थेट पाहू शकणार आहात.


WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया स्क्वॉड 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.