IND vs WI 4th T20 Live: भारतासाठी 'करो या मरो'चा सामना, चौथ्या टी20 चे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
IND vs WI 4th T20 Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे.
भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय
शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. गिल आणि यशस्वी या जोडीने विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. या युवा जोडीपुढे विंडिजचे गोलंदाज कमकुवत जाणवत होते. गिल-यशस्वी या जोडीने विक्रमी दीडशतकी भागिदारी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. अखेरच्या काही षटकात गिल बाद झाला पण तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी 94 चेंडूत 165 धावांची भागिदारी केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल याने 47 चेंडूत 79 धावांचे योगदान दिले तर शुभमन गिल याने 47 चेंडूत 77 धावा जोडल्या.
तीन सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर अखेर शुभमन गिल फॉर्मात परतलाय. गिल याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक सुरुवात केली. गिल याने वेस्ट इंडिजची गोलंदाजी फोडून काढली. गिल याने 47 चेंडूत 77 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत गिल याने 5 गगनचुंबी षटकार आणि तीन खणखणीत चौकार मारले. शुभमन गिल याने यशस्वी जायस्वाल याच्या साथीने भारताची धावसंख्या वाढवली. 77 धावांवर असताना रोमर्ड शेफर्ड याने गिल याला तंबूत धाडले.
शेफर्डने भारताला पहिला धक्का दिला... शुभमन गिल 77 धावांवर बाद झाला.
गिल आणि यशस्वी जायस्वाल यांनी वेस्ट इंडिजची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी अर्धशतके झळकावली आहेत. आतापर्यंत या जोडीने बिनबाद 157 धावांची भागिदारी केली आहे. गिल 69 तर यशस्वी 79 धावांवर खेळत आहे. भारताला विजयासाठी 30 चेंडूत 22 धावांची गरज आहे.
गिल-यशस्वीची शतकी भागिदारी... 12 षटकात 129 धावांची सलामी
भारताची अश्वासक सुरुवात... गिल आणि यशस्वीने केली दमदार सुरुवात
विंडिजची 178 धावांपर्यंत मजल
हेटमायर बाद झालाय. अर्शदीपने घेतली विकेट...
हेटमायरने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली. 35 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ठोकल्या 50 धावा
जेसन होल्डरच्या रुपाने विंडिजला सातवा धक्का बसलाय
विंडिजला सहावा धक्का बसलाय.
वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतलाय.... चहलने घेतली विकेट
वेस्ट इंडिजचे चार गडी बाद, 10 ओव्हरनंतर 84 धावांवर
काइल मायर्स याला बाद करत अर्शदीपने भारताला पहिले यश मिळवून दिले.
काइल मायर्सने अक्षर पटेलची गोलंदाजी फोडून काढली... पहिल्याच षटकात 15 धावा वसूल केल्या.
वेस्ट इंडिजचे सलामी फलंदाज ब्रेंडन किंग आणि काइल मायर्स मैदानात उतरले आहेत... भारताकडून अक्षर पटेल पहिले षटक टाकण्यासाठी मैदानात
ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिम्रोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, ओबेद मैककॉय
यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार
भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. तिसऱ्या सामन्यातील संघ मैदानात उतरवलाय
नाणेफेक जिंकून पॉवेलने फलंदाजीचा निर्णय घेतला... भारत प्रथम गोलंदाजी करणार
वेस्ट इंडिजच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. जेसन होल्डरचे पुनरागमन, शाय होफ याला संधी
चौथ्या टी20 सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
West Indies vs India, 4th T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने कमबॅक केले. आज चौथा टी20 सामना फ्लोरिडा येथे रंगणार आहे. हा सामना जिंकून विडिंज मालिका खिशात घालणार की भारत जिंकून बरोबरी साधणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप गेलेल्या सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यात विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मा याने सूर्यकुमार याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने तिन्ही सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सलामी फलंदाज शुभमन गिल तिन्ही सामन्यात फेल गेला. पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कर्णधार हार्दिक पांड्यालाही अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीत कुलदीप आणि चहल यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. हार्दिकनेही अचूक टप्प्यावर मारा केलाय. आज होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय ? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय.
फ्लोरिडा येथे आज भारताला आज पराभवाचा सामना करावा लागल्यास मालिका गमावावी लागेल. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो असा आहे. हार्दिक पांड्या अॅण्ड कंपनी विजयासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघाच्या नजरा मालिका विजयाकडे असतील. त्यामुळे आज होणारा सामना रंगतदार होईल. मागील सात वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरोधात टी20 मालिका जिंकता आली नाही. कॅरेबिअन आर्मीने 2016 मध्ये अखेरची टी20 मालिका जिंकली होती.
भारताच्या युवा टीमपुढे तगड्या वेस्ट इंडिजचे आव्हान आहे. कागदावर विडिंजचा संघ वरचढ दिसतोय. आतापर्यंत झालेले तिन्ही सामन्याची खेळपट्टी संथ होती, पण आता चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होत आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, त्यामुले चौथा सामना हायस्कोरिंग असेल. आजच्या सामन्यात विडिंजचे पारडे जड दिसतेय.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 18 सामने जिंकलेत तर विडिंजला नऊ सामन्यात विजय मिळालाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
पार्श्वभूमी
West Indies vs India, 4th T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने कमबॅक केले. आज चौथा टी20 सामना फ्लोरिडा येथे रंगणार आहे. हा सामना जिंकून विडिंज मालिका खिशात घालणार की भारत जिंकून बरोबरी साधणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप गेलेल्या सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यात विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मा याने सूर्यकुमार याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने तिन्ही सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सलामी फलंदाज शुभमन गिल तिन्ही सामन्यात फेल गेला. पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कर्णधार हार्दिक पांड्यालाही अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीत कुलदीप आणि चहल यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. हार्दिकनेही अचूक टप्प्यावर मारा केलाय. आज होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय ? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय.
फ्लोरिडा येथे आज भारताला आज पराभवाचा सामना करावा लागल्यास मालिका गमावावी लागेल. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो असा आहे. हार्दिक पांड्या अॅण्ड कंपनी विजयासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघाच्या नजरा मालिका विजयाकडे असतील. त्यामुळे आज होणारा सामना रंगतदार होईल. मागील सात वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरोधात टी20 मालिका जिंकता आली नाही. कॅरेबिअन आर्मीने 2016 मध्ये अखेरची टी20 मालिका जिंकली होती.
हेड टू हेड -
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 18 सामने जिंकलेत तर विडिंजला नऊ सामन्यात विजय मिळालाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
कोण वरचढ ?
भारताच्या युवा टीमपुढे तगड्या वेस्ट इंडिजचे आव्हान आहे. कागदावर विडिंजचा संघ वरचढ दिसतोय. आतापर्यंत झालेले तिन्ही सामन्याची खेळपट्टी संथ होती, पण आता चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होत आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, त्यामुले चौथा सामना हायस्कोरिंग असेल. आजच्या सामन्यात विडिंजचे पारडे जड दिसतेय.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 -
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेईंग 11 -
ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिमरन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्ज़ारी जोसेफ आणि ओबेद मैककॉय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -