IND vs IRE 1st T20: पहिल्या टी20 सामन्यात आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आयर्लंडने निर्धारित 20 षटकांत 7 विकेट गमावत 139 धावा केल्या. बॅरी मॅकग्राथी आणि कर्टिस कॅम्फर यांच्यात सातव्या विकेटसाठी पन्नासहून अधिक धावांच्या भागीदारीने संघाची धावसंख्या 139 धावांपर्यंत पोहोचवली. बॅरी मॅकग्राथीने  नाबाद 51 धावा केल्या. तर कर्टिस कॅम्पफरने धावांचे योगदान दिले. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोईने 2-2 बळी घेतले. 


नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला अतिशय भेदक मारा करत आयर्लंडच्या फलंदाजांना तंबूत धाडले होते. 31 धावांत आयर्लंडचे पाच गडी तंबूत परतले होते. सुरुवातीची फळी लवकर बाद झाल्यानंतर आयर्लंडचा डाव लवकर संपणार का ? असे वाटत होते. पण तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. आयर्लंडने दमदार पुनरागमन करत भारतीय गोलंदाजी फोडून काढली. 31 धावांत आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. कर्णधार  पॉल स्ट्रलिंग यालाही मोठी खेळी करता आली नाही. आघाडीचेचार फलंदाजांना तर दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. 


कर्टिस कम्फर आणि बैरी मैक्ग्राथी यांनी ताबोडतोड फलंदाजी करत आयर्लंडची धावसंख्या वाढवली. बैरी मैक्ग्राथी याने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. बैरी मैक्ग्राथी याने 33 चेंडूत चार षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. तर कर्टिस कम्फर  याने 33 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 39 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.


 


बुमराहचे दमदार पुनरागमन - 


तब्बल वर्षभरानंतर जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानावर परतला. त्याने दणक्यात कमबॅक केले. बुमराहने पहिल्याच षटकात चार धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या होत्या. बुमराह याने चार षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. बुमराहने आपले अखेरच्या षटकात फक्त एक धाव दिली. 


अर्शदीपचे महागडे षटक -


अखेरच्या षटकात अर्शदीप सिंह याने खराब गोलंदाजी केली. अर्शदीप सिंह याने अखेरच्या षटकात तब्बल 22 धावांची लयलूट केली. अर्शदीपच्या अखेरच्या षटकात  McCarthy याने अर्शदीपची गोलंदाजी फोडून काढली. त्याने दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 22 धावा चोपल्या. जसप्रीत बुमराह याने 19 व्या षटकात भेदक मारा करत आयर्लंडच्या गोलंदाजांना थोपवलं होतं. बुमराहने 19 व्या षटकात फक्त एक धाव देत धावसंख्येला आवर घातली होती. पण बुमराहच्या मेहनतीवर अर्शदीप सिंह याने पाणी फेरले. 


भारताची गोलंदाजी कशी ?


भारताकडून जसप्रीत बुमराह, पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप याला एक विकेट मिळाली. वॉशिंगटन सूंदर आणि शिवब दुबे यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.