INDvsENG : टीम इंडियाने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकत चार सामन्यांची मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. या मालिकेचा तिसरा सामना 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण तिसर्‍या कसोटीपूर्वी टीम इंडिया मोठ्या अडचणीत आल्याचं दिसत आहे. तिसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीला बंदीचा धोका आहे. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.


कर्णधार विराट कोहलीने तिसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी पंच नितीन मेननच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. कर्णधार विराट कोहली पंचांशी बराच वेळ निर्णयावरुन वाद घालत होता. जो रूटला आऊट न दिल्यामुळे कर्णधार विराट कोहली खूप चिडला होता.


...तर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, इंग्लंडच्या माँटी पनेसरचा सल्ला


आयसीसीचा नियम काय सांगतो?


आयसीसीच्या नियमांनुसार पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवण्यासाठी खेळाडूंवर लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 शुल्क आकारले जाते. या शुल्कामुळे, खेळाडूला 1 ते 4 दरम्यान डिमिरेट गुण दिले जातात. जर एखाद्या खेळाडूला 24s महिन्यांच्या कालावधीत चार डिमेरिट गुण मिळाले तर त्याच्यावर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घातली जाते.


IND vs ENG : टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी


एक कसोटी सामन्याची बंदी घातली जाऊ शकते


2019 च्या अखेरीस विराट कोहलीला आधीपासूनच दोन डिमरेट गुण मिळाले आहेत. पंचांच्या चेन्नईत झालेल्या निर्णयावर नाराजीमुळे विराट कोहलीला दोन किंवा त्याहून अधिक डिमरेट गुण मिळाले तर त्याच्यावर एका कसोटीसाठी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीला अहमदाबाद कसोटीतून बाहेर पडावे लागू शकते.


विराट कोहलीने आतापर्यंत या मालिकेत फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने अत्यंत कठीण परिस्थितीत मालिकेच्या दोन्ही सामन्यात अर्धशतक ठोकली आहेत. विराट कोहली खेळत नसेल तर संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर संघाचा कर्णधार असेल.