IND Vs AUS 2nd Test Live Score Updates | दुसऱ्या कसोटीत भारताचा आठ विकेट्सनी विजय
IND Vs AUS 2nd Test Live Score Updates | दुसऱ्या कसोटीत भारताचा आठ विकेट्सनी विजय
Advertisement
IND Vs AUS 2nd Test Live Score Updates | भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. फलंदाजीत सरस कामगिरी करणाऱ्या भारताने गोलंदाजीतही कमाल केली.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 29 Dec 2020 09:37 AM
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांवर आटोपला असून भारतासमोर विजयासाठी 70 धावांचं आव्हान आहे. हा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी भारताकडे आहे.
भारताने विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या कॅमरुन ग्रीनची विकेट मिळवण्यात मोहम्मद सिराजला यश आलं आहे. कॅमरुन ग्रीन 45 धावा करुन बाद झाला.ऑस्ट्रेलियाचे आठ फलंदाज माघारी परतले असून एकूण आघाडी 50 धावांची आहे.
दुसरीकडे कॅमरुन ग्रीन खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. कसोटी क्रिकेटमधील अर्धशतक झळकावण्यासाठी त्याला अवघ्या 9 धावांची गरज आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने एकूण 40 धावांची आघाडी घेतली आहे.
103 चेंडूत 22 धावा केल्यानंतर पॅट कमिन्स जसप्रीत बुमराच्या बाऊन्सरचा बळी ठरला. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या तासात कमिन्सने ग्रीनच्या साथीने भारतीय गोलंदाजांचा योग्यरित्या सामना केला. परंचु बुमराच्या शॉर्ट पिच बॉलचा अंदाज न आल्याने कमिन्स झेलबाद झाला. सातव्या विकेटसाठी दोघांनी 57 धावांची भागीदारी रचली होती.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. टीम इंडियाला पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेता आली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे सहा विकेट्सही मिळवल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. पण टीम इंडिया अतिशय मजबूत स्थितीत आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने बॉक्सिंग डे कसोटीत आपली पकड मजबूत केली आहे आहे. भारताचा पहिला डावा 326 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाला 131 धावांची आघाडी मिळवण्यात यश आलं आहे. उपाहारानंतर ऑस्ट्रेलिया आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात करेल.
बॉक्सिंग डे कसोटीत भारताने पहिल्या डावात 300 धावांच्या टप्पा पार केला आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठं यश मिळालं आहे. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा माघारी परतले आहेत. अजिंक्य रहाणे 112 धावांवर रन आऊट झाला. तर दुसरीकडे रवींद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पंधरावं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जडेजा मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर 57 धावा करुन बाद झाला. जडेजा आणि रहाणे यांनी सहाव्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचली होती.
दुसऱ्या कसोटीच्या दुसरा सत्रही भारताने ठसा उमटवला. चहापानापर्यंत खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 136 धावा केल्या होता. टिम पेन आणि कॅमरुन ग्रीन मैदानात आहे. भारताकडून बुमरा आणि अश्विनने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कसोटीत पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने लाबुशेनची अत्यंत महत्त्वाची विकेट घेतली.
बॉक्सिंग डे कसोटीत आतापर्यंत भारतीय गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पहिल्या सत्रात वर्चस्व मिळवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्याची संधी दिली नाही. लंचनंतर मैदानात आलेल्या लाबुशेन आणि हेड या दोघांनीही 86 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डावा सावरला होता. मात्र धोकादायक ठरत असेलल्या हेडची विकेट जसप्रीत बुमराने घेतेली. त्याने 38 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग मंदावला. त्यातच ऑस्ट्रेलियाला 134 धावसंख्येवर पाचवा झटका बसला. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या लाबूशेनची विकेट मोहम्मद सिराजने घेतली. सध्या कॅमरुन ग्रीन आण कर्णधार टिम पेन मैदानात आहेत.
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं. फिरकीपटू आर अश्विनने दोन विकेट्स घेतल्या, ज्यात सलामीवीर मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. तर जसप्रीत बुमराने जो बर्न्स माघारी धाडलं. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 27 षटकात तीन विकेट्स गमावून 65 धावा केल्या. लाबुशेन 26 तर हेड चार धावांवर नाबाद आहेत.
बॉक्सिंग डे कसोटी भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडण्यास भारतीय गोलंदाजांना यश आहे. दोन्ही सलामीवीरांना बाद केल्यानंतर स्टीव्ह स्मिथही माघारी परतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा खिंडार पाडण्याचं काम जसप्रीत बुमराने केलं. सलामीवीर जो बर्न खातंही न उघडता माघारी परतला. तर आर अश्वीनने मॅथ्यू वेडला (30 धावा) बाद केलं. यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथलाही मैदानात जम बसवण्यापूर्वीच अश्विनने त्याची विकेट घेतली. स्मिथलाही भोपळा फोडता आला नाही. 15 षटकात ऑस्ट्रेलिया तीन विकेट्सच्या मोबदल्यात 38 धावा केल्या होत्या.
पार्श्वभूमी
मेलबर्न : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. पण टीम इंडिया अतिशय मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सहा बाद 133 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे सध्या दोन धावांची आघाडी असून चार विकेट्स हातात आहेत.
दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे 112 धावांवर बाद झाला. त्यानंतर 57 धावा करुन रवींद्र जडेजाही माघारी परतला. मग भारताचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला. परिणामी टीम इंडियाने 131 धावांची आघाडी घेतली.
यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची घसरगुंडी पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे दाणादाण उडवत सहा विकेट्सही मिळवल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. तिसरा दिवस संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सहा बाद 133 धावा केल्या होत्या. कॅमरुन ग्रीन 17 धावा आणि पॅट कमिन्स 15 धावा करुन नाबाद आहेत.
आता चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच सामना संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दुसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. तर अर्धशतकी खेळ करणाऱ्या रवींद्र जडेजाने गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्याने दोन विकेट्स घेतल्या.
पहिला सामन्यातील लाजिरवाणा पराभव आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फेव्हरेट समजलं जात होतं. होतं. परंतु टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केलं आहे. ज्या पीचवर टीम इंडियाने 300 पेक्षा धावा केल्या, त्यावर ऑस्ट्रेलिया एका फलंदाजाला अर्धशतकही करता आलेलं नाही.
प्लेईंग इलेव्हन भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.