Gautam Gambhir on Rohit Sharma Virat Kohli Retirement : रोहित शर्माने 8 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर फक्त चार दिवसांनी 12 मे रोजी, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. दोन्ही दिग्गजांच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दोघेही 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करू इच्छित होते. पण मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्यावर दबाव आणला. दोघांनीही रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले.
पण आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir News) याने रोहित आणि विराटच्या निवृत्तीबद्दल मौन सोडले आहे. तो म्हणाला की, निवृत्ती हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही.
न्यूज 18 शी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, एखाद्या खेळाडूने कधी कारकीर्द संपवायची याचा निर्णय खेळाडूवर अवलंबून असतो. मला वाटतं कधी खेळायला सुरुवात करता आणि कधी निवृत्ती घ्यायची, हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही."
रोहित आणि विराटची उणीव भासणार...
रोहित शर्माने 7 मे रोजी आणि विराट कोहलीने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दोन दिग्गजांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला . मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही कबूल केले की, विराट आणि रोहितच्या जाण्यामुळे तरुणांना संधी मिळेल, परंतु त्यांची जागा घेणे सोपे नसेल.
गंभीर म्हणाला, "हो, ते कठीण असेल, पण निश्चितच लोक हात वर करतील. जर कोणी निघून गेले तर असा खेळाडू येऊ शकतो, जो देशासाठी काहीतरी खास करू शकेल." गौतम गंभीरने चॅम्पियन्स ट्रॉफीचे उदाहरण देत म्हटले की, जसप्रीत बुमराह नसतानाही टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. गंभीरने हे सांगण्याचा प्रयत्न केला की, भारतीय संघ वरिष्ठ खेळाडूंशिवायही पुढे जाऊ शकतो.
हे ही वाचा -