नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून 2025चा आशिया कप टी 20 फॉरमॅटमध्येखेळवला जात आहे. पुढील महिन्या संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतानं आशिया कप स्पर्धेसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. मात्र, त्याबाबत रोज नवनव्याअपडेट समोर येत आहेत. आशिया कपसाठी भारतीय संघात शुभमनगिल, यशस्वी जयस्वास, साई सुदर्शन आणि श्रेयसअय्यरला स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या हवाल्यानंयासंदर्भात चर्चा सुरु आहेत. मात्र, बीसीसीआयनं अजून संघ निवडीबाबत अपडेट दिलेली नाही.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होईल तर स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार असून 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. मात्र, भारताचा संघ अद्याप बीसीसीआयनं जाहीर केलेला नाही. आशिया कपचे सामने दुबई आणि अबूधाबीत होतील.
भारतीय संघाबाबत नवी अपडेट
नव्या अपडेटसनुसार निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संघात फार बदल करायचा नाही. या फॉरमॅटमध्ये जी टीम खेळत होती त्यांना पुन्हा संधी देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळंशुभमनगिल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि श्रेयसअय्यर यांना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन देखील संधी मिळणं अशक्य मानलं जातंय.
आशिया कपमध्ये भारताची सलामी संजूसॅमसन आणि अभिषेक शर्मा करु शकतात. जुलै2024 पासून भारतासाठी टी 20 मध्ये सर्वाधिक धावा संजूसॅमसन यानं केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतत्यानं तीन शतक केली आहेत. अभिषेक शर्मा टी 20 क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. यानंतर तिसऱ्या स्थानावर तिलक वर्माला संधी मिळू शकते. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकूसिंग, शिवमदुबे, जितेश शर्मा यांच्या नावावर विचार केला जाऊ शकतो. फिरकी गोलंदाजीसाठी वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, कुलदीप यादवला संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजी हर्षित राणा, अर्शदीपसिंग आणि जसप्रीतबुमराहकरु शकतात.
आशिया कपसाठी संभाव्य टीम इंडिया : अभिषेक शर्मा, संजूसॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पांड्या, शिवमदुबे, रिंकूसिंग, अक्षर पटेल (उपकॅप्टन ), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वाशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जसप्रीतबुमराह
