''भारतात पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसोबत चर्चा झाली होती. दोन्ही देशांमध्ये कैद असलेल्या 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना, महिलांना आणि मानसिक स्थिती नीट नसलेल्यांना सोडून देण्यात यावं'', असा प्रस्ताव मांडल्याचंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं.
''इतर ठिकाणीही मालिका शक्य नाही''
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका एखाद्या तिसऱ्याच ठिकाणी होण्याचीही शक्यता नसल्याचं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तान त्यांच्याकडील दहशतवाद बंद करत नाही, तोपर्यंत हे शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.