या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर अगदी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. मनप्रीत सिंगनं सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं. पण मोहम्मद इरफाननं सातव्या मिनिटाला गोल डागून पाकिस्तानला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतर भारतानं पाकिस्तानला
सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.
एस. व्ही. सुनीलनं दहाव्या आणि 41व्या मिनिटाला गोल झळकावून भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. मग तलविंदरन सिंगनं 50व्या आणि रुपिंदरपाल सिंगनं 54व्या मिनिटाला गोल करुन भारताचा 5-1 असा विजय निश्चित केला.