India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. पाकिस्ताननं टीम इंडियाला पाच विकेट्सनी पराभूत केलं. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) महत्त्वाची कॅच सोडल्यामुळे सध्या त्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. 18 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने आसिफ अलीची महत्त्वाची कॅच सोडली. त्यानंतर आसिफने आठ चेंडूंमध्ये 16 धावा करत पाकिस्तानी संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताच्या हातून एक चांगली संधी गेली. 


भारताच्या पराभवानंतर नेटकरी अर्शदीप सिंहवर संतापलेले पाहायला मिळत आहेत. नेटकरी सोशल मीडियावर अर्शदीपला ट्रोल करत आहे. या संदर्भातील अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ट्विटवर #ArshdeepSingh ट्रेंडींगमध्ये आहे. 


विराट कोहलीचा अर्शदीपला पाठिंबा


दरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटवर विराट कोहलीनं अर्शदीप सिंहला पाठिंबा दिला आहे. विराटने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, 'चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा मी पाकिस्तानविरुद्ध माझा पहिला सामना खेळत होतो, तेव्हा मीही खराब शॉट खेळून आऊट झालो होतो. दबावाखाली कोणीही चूक करू शकतो. संघातील वातावरण सध्या चांगलंच आहे. अर्शदीपला त्याची चूक समजून घ्यावी लागेल जेणेकरुन तो पुढच्या वेळी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकेल.'


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मीम्स


 






 






 






 






 






तर याच्या उलट काही चाहते अर्शदीपच्या समर्थनार्थ उतरले आहेत. त्यांनी अर्शदीपला पाठिंबा दिला आहे.