Ind vs Ban : भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीसाठी जाहीर झालेल्या टीम इंडियामध्ये 'हे' 7 मोठे बदल

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडकर्त्यांनी जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे विराट कोहलीचे पुनरागमन. विराटने शेवटचा कसोटी सामना जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता, त्यानंतर त्याने कोणतीही कसोटी मालिका खेळली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुसरा बदल म्हणजे ऋषभ पंतने प्रदीर्घ काळानंतर कसोटी संघात पुन्हा पुनरागमन केलं आहे. दुसरीकडे केएल राहुलचीही संघात निवड झाली आहे. मात्र, राहुलचा प्लेईंग-11 मध्ये समावेश होईल की नाही हे सांगणे कठीण आहे.

यश दयाल यांचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला होता, पण दुखापतीमुळे तो बाहेर पडला होता.
चौथा बदल म्हणजे देवदत्त पडिक्कलची संघात निवड न होणे. या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करताना त्याने धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या एकमेव डावात 65 धावा केल्या. मात्र विराट आणि राहुल संघात परतल्याने त्याला वगळावे लागले.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघर्ष करताना दिसलेल्या रजत पाटीदारलाही कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याने केवळ 63 धावा केल्या होत्या.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर इशान किशनच्या जागी संघात निवड करण्यात आली होती, परंतु दुसऱ्या कसोटीनंतर त्याला वगळण्यात आले.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारकडे एक उदयोन्मुख वेगवान गोलंदाज म्हणून पाहिले जात होते. मात्र बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी घोषित केलेल्या भारतीय संघातूनही त्याला वगळण्यात आले आहे.