In Pics : दुसऱ्या दिवसअखेर भारत 321 वर 7 बाद, 144 धावांची आघाडी घेत जाडेजा-अक्षर क्रिजवर
IND vs AUS 1st Test : नागपुरात सुरु भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला असून भारताने 7 गडी गमावत 321 धावा केल्या आहेत.
Continues below advertisement
IND vs AUS
Continues below advertisement
1/10
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात 144 धावांची मजबूत आघाडी सध्या घेतली आहे.
2/10
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात पहिला कसोटी सामना सुरु असून दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला आहे.
3/10
दुसऱ्या दिवसअखेर भारताने 7 गडी गमावत 321 धावा ठोकल्या आहेत.
4/10
पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारत 77 वर 1 बाद अशी अवस्था असताना दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहितच्या शतकानंतर अक्षर आणि जाडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 144 धावांची आघाडी घेतली आहे.
5/10
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली. पण भारताच्या दमदार गोलंदाजीमुळे अवघ्या 177 धावांवर कांगारुंचा डाव आटोपला.
Continues below advertisement
6/10
यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावांची सर्वाधिक खेळी केली.
7/10
177 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपल्यावर भारताकडून फलंदाजीला आलेल्या कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. आल्याआल्या चौकार मारण्यास त्यानं सुरुवात केली. ज्यामुळे पहिला दिवस संपताना भारतानं 77 धावांपर्यंत मजल मारली.
8/10
केएल राहुल 20 धावा करुन बाद झाला होता तर रोहित नाबाद 56 धावांवर क्रिजवर होता.
9/10
त्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विन, विराट, केएस भरत, सूर्यकुमार, पुजारा हे सर्वजण स्वस्तात माघारी परतले. रोहितनं 120 धावा करत दमदार शतक ठोकलं. तसंच ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीने तब्बल 5 फलंदाजांना तंबूत धाडलं. याशिवाय नॅथन लियॉन आणि पॅट कमिन्स यांनीही एक-एक विकेट घेतली. दरम्यान भारताचे स्टार अष्टपैलू जाडेजा आणि अक्षर अनुक्रमे 66 आणि 52 धावांवर क्रिजवर आहेत.
10/10
सामन्यात रोहितने शतक झळकावताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (ODI, Test आणि T20) शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
Published at : 10 Feb 2023 07:00 PM (IST)