उजनीचा पाणीसाठा मायनसच्या उंबरठ्यावर, आज किती पाणीसाठा? महिनाभरात शेतीची आवर्तनं थांबणार
उजनी धरणात जवळपास वर्षभरात 13 टीएमसी एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन होते. शेतीला लागणारे तब्बल 65 हजार हेक्टर जमिनीला लागणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होते.
Ujani Dam
1/6
एप्रिल महिन्याच्या मध्यावर तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे.सोलापूरात गेल्या आठवडाभरापासून 40 अंशांच्या पुढे तापमान गेले आहे.
2/6
हजारो गावांची तहान भागवणारे तसेच शेती आणि पाणीपुरवठा योजनांसाठी महत्त्वाचे असणारे उजनी धरण आज 1.97 टक्क्यांवर गेले आहे.
3/6
उजनी धरणातील बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उजनी धरणात सध्या केवळ 1832 दलघमी एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.
4/6
सध्या जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टर जमिनीला उजनीचे पाणी पोहोचते. दुसरीकडे बाष्पीभवन आणि बॅक वॉटरवरील कृषीपंप आणि धरणावरील 42 पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी पाणी उपसा सुरू आहे.
5/6
त्यामुळे धरणातील पाणीपातळी दररोज एक टीएमसीने खालावत आहे.शेतीसाठी सध्या दुसरे आवर्तन सोडण्यात आले असून ते 25 मेपर्यंत सुरू राहणार आहे.
6/6
उणे 20 टक्क्यानंतर कॅनॉलमधून शेतीसाठी पाणी सोडता येत नसल्याने 25 मेनंतर धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच असणार आहे.
Published at : 17 Apr 2025 12:12 PM (IST)