PHOTO : नारळी पौर्णिमेनिमित्त करवंटीमध्ये साकारले समुद्राला नारळ अर्पण करतानाचे चित्र
नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नारळाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत सर्वच भागाचा उपयोग केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज नारळी पौर्णिमा आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असंही म्हणतात.
या दिवशी कोळी बांधव आणि समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करुन त्याला नारळ अर्पण करतात.
या दिवशी अर्पण करायचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले जाते.
या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील नेरुर गावातील हर्षद मेस्त्री यांनी नारळाच्या करवंटीमध्ये समुद्राला नारळ अर्पण करतानाचे चित्र रेखाटले आहे.
अॅक्रेलिक रंगांच्या साहाय्याने दोन तासात नारळाच्या करवंटीमध्ये हे चित्र साकारत नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रामुख्याने मासेमारी करणार्या कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे.