Raj Thackeray : स्व. बाळासाहेब ठाकरे हे असे नेते होते की ते हयात नसतानाही आजही लोकांच्या स्मृतीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जिवंत आहेत.
Raj Thackeray : स्व. बाळासाहेब ठाकरे हे असे नेते होते की ते हयात नसतानाही आजही लोकांच्या स्मृतीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जिवंत आहेत.
Continues below advertisement
बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा कोणता?; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट, काय म्हणाले?
Continues below advertisement
1/9
जन्मशताब्दी उलटून गेल्यावरही बाळासाहेबांचा प्रभाव कायम राहील, असा राज ठाकरेंना पूर्ण विश्वास आहे.
2/9
मात्र त्या काळात मराठी माणूस दुभंगलेला, खचलेला किंवा अन्याय सहन करणारा नसावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
3/9
आजच्या राजकारणात निष्ठा, तत्वे सहज विकली जात आहेत आणि राजकारण पूर्णपणे व्यवहारिक झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.
4/9
बाळासाहेबांच्या काळात सत्तेपेक्षा विचार आणि प्रभाव अधिक महत्त्वाचा होता, असे राज ठाकरे म्हणाले.
5/9
बाळासाहेबांना स्वतः सत्तेची हाव नव्हती, पण सामान्य कार्यकर्ता सत्तेत पोहोचावा यात त्यांना समाधान मिळत होते.
Continues below advertisement
6/9
सत्ता येते–जाते, पण पिढ्यान्पिढ्या लोकांना झपाटून टाकणारा प्रभाव फार थोड्यांनाच साधता येतो, असे त्यांनी नमूद केले.
7/9
बाळासाहेबांचा दृष्टिकोन कालातीत असून भविष्यातही तो तितकाच सुसंगत राहील, असे राज ठाकरे म्हणाले.
8/9
राजकारणात कधी लवचिक भूमिका घ्यावी लागली तरी ती कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी नसेल, असा शब्द त्यांनी दिला.
9/9
बाळासाहेब आणि मराठी माणूस यांच्यावरील आपली व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धा कधीही कमी होणार नाही, असे सांगून राज ठाकरेंनी विनम्र अभिवादन केले.
Published at : 23 Jan 2026 03:53 PM (IST)
= 9">