Raj Thackeray & PM Modi: पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी बिहारमध्ये प्रचार अन् फिल्म इंडस्ट्रीच्या कार्यक्रमाला जायला नव्हतं पाहिजे, राज ठाकरेंना काय खटकलं?
Operation Sindoor Air strike in Pakistan: मॉक ड्रिल कसलं करता? कोम्बिंग ऑपरेशन करा, पाकिस्तानच्या हल्ल्यावर राज ठाकरेंची सडकून टीका. पहलगाम हल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी लक्ष्य
Raj Thackeray on Operation Sindoor
1/12
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानांच्या साहाय्याने क्षेपणास्त्रांचा (Air Strike) मारा करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहीमेला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. या मोहीमेतंर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले.
2/12
या पार्श्वभूमीवर देशभरातून पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्र सरकारच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत.
3/12
दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही. त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला तेच अजून आपल्याला सापडले नाहीत. त्यामुळे देशात मॉक ड्रिल नाही तर कोम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे, असे सडेतोड मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले
4/12
राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
5/12
सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. तो दौरा अर्धवट सोडून ते भारतात आले आणि थेट बिहारला प्रचाराला गेले. ही गोष्ट करण्याची गरज नव्हती. त्यानंतर मोदी केरळमध्ये अदानींच्या बंदराचे उद्घाटन करायला गेले. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्हेव कार्यक्रमाला उपस्थिती लावली. इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी टाळता आल्या असत्या, असे खडे बोल राज ठाकरे यांनी सुनावले.
6/12
नाक्यानाक्यावर ड्रग्ज मिळतायत. ते येतायत कुठून? का येतायत? लहान लहान पोरं ड्रग्ज घेतायत. शाळेतली पोरं ड्रग्ज घेतायत. ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलतायत, इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
7/12
पहलगामला ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी मी पहिल्यांदा ट्विट केले होते की ज्यांनी हल्ला केला त्यांना कठोरातले कठोर शासन झाले पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नसते. अमेरिकेमध्ये दोन ट्विन्स टॉवर पाडले, म्हणून त्यांनी तिकडे जाऊन काही युद्ध केले नाही. त्यांनी ते अतिरेकी शोधून ठार मारले. देशात युद्धजन्य परिस्थिती आणायची, मॉक ड्रिल करायचं सायरन वाजवायचे, हे काय सुरू आहे, असे राज ठाकरे यांनी विचारले.
8/12
ऑपरेशन सिंदूर या मोहीमेतंर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहर यांच्या कुटुंबीयांसह तब्बल 90 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
9/12
ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती भारत सरकारने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सोफिया कुरेशी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले.
10/12
आम्ही पाकिस्तानकडून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेला तोंड देण्यास तयार आहोत. त्याचबरोबर जर भविष्यात पाकिस्तानने कोणतीही चिथावणीखोर कारवाई केली, तर भारतीय सैन्य त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले आहे.
11/12
मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे.
12/12
कोटली अब्बासमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं. या छावणीत सुमारे 1500 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय, पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर आणि महमूना झोया येथेही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
Published at : 07 May 2025 03:06 PM (IST)