RSS 'Vijayadashami Utsav' in Nagpur : डॉ.मोहन भागवत, सरसंघचालक यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

RSS Vijayadashami Utsav in Nagpur :

RSS

1/7
देशात सर्व धर्म आणि पंथांचा आदर करणारा एक धर्म आहे, हा हिंदूंचा देश आहे, सर्वांची काळजी घेणार्यालाच हिंदू असे म्हणतात.. आणि हे फक्त हिंदुस्थानच करतो असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात बोलत होते... प्रतापनगर शिक्षण संस्थेने हे व्याख्यान आयोजित केले होते... जगात बाकी सर्वत्र मारामारी होत आहेत, तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, युक्रेन युद्धाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. हमास आणि इस्रायलमधील युद्ध ही होत आहे... मात्र, आपल्या देशात या अश्या मुद्द्यावर कधीही भांडण झाले नाही. आम्ही या मुद्द्यावर कधीही लढलो नाही, अशा मुद्द्यांवर आम्ही कोणाशीही भांडत नाही याचे कारण आपण हिंदू आहोत, असे आहे आणि हा हिंदूंचा देश आहे असं मोहन भागवत म्हणाले...
2/7
छत्रपती शिवाजी महाराज यांच जीवन आपण अनुकरण करावे असंच आहे. त्यांचं अनुकरण म्हणजे घोड्यावर बसने एवढे सोपे नाही, त्यांनी ज्या गुणांचा आधारावर कर्तृत्व गाजवले ते गुण कुठल्याही काळात महत्वाचे आहे. त्यांना काय करायचे ते स्पष्ट होते,काय करायचे हे माहीत होते,हा त्यांचा गुण होता. लोकांचं दुःख त्यांना बघवलं गेलं नाही. लोकांची दयनीय अवस्था, महिला सुरक्षित नाही. महिलांची दुर्दशा पाहून शोक त्यांचा मनात होता., असे मोहन भागवत म्हणाले.
3/7
शिवाजी महाराजांच्या काळात आई -वडील संस्कार द्यायचे. मात्र,आजकाल आई वडील हे मोबाईलमध्ये असतात. वडीलांकडून मिळाले बाळकडूमुळे विचार स्पष्ट होतो. हा हिंदूच देश आहे. हिंदू म्हणजे मुस्लिम लोकांचा सांभाळ केला. हे भारतच करू शकतो असे ते म्हणाले आहेत.
4/7
युक्रेन लढाई,हमास युद्ध आपल्य काळात अशी लढाई झाली नाही. आपण भांडत नाही म्हणून आपण हिंदू आहे, असा देश असला पाहिले ज्यात आई सुरक्षित राहतील. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजा बनण्याची वेळ आलीं. तेव्हा प्रजेच्या संरक्षणासाठी राजा झाले. आपण एकटे असलो तरी असुरक्षित आहोत. आपल्याला माणसं राखता आली पाहिजे. तेव्हा आपण सुरक्षित असतो, मोहन भागवत म्हणाले.
5/7
शिवाजी महाराज पुण्यात आल्यावर कसबा गणपती शोधून काढला आणि शेती करायला सुरवात केली. लोकांना वसवले. तरुण मित्र जमा केले, त्यांचाकडे असलेली कला निरखून लोक प्रेमाने जोडले. मित्रांचे दोष प्रेमाने दूर केले, संकटात मदात करत मैत्री केली, असे मोहन भागवत म्हणाले.
6/7
तेलंगणाचा कुतुबशाह शिवाजी महाराजाना घाबरला होता. शिवाजी महाराज यांचे विदेशी मुसलमानांशी भांडण होत. भारतात राहणाऱ्या मुसलमानांशी वैर नव्हतं. शिवाजी महाराजांनी एक-एक माणूस उभा केला होता. शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभे केले, त्यामुळें त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले, असेही भागवत म्हणाले.
7/7
शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभे केले, त्यामुळें त्यांनी उभे केलेले राज्य लोकशाहीचे राहिले..राजा लोकांचा बसला असं राज्य निर्माण केले..पण त्यासाठी त्यांनी मेहनत केली.. 50 वर्षात त्यांनी अखंड घोड्यावर बसून मिळवलं, असे मोहन भागवत म्हणाले.
Sponsored Links by Taboola