In Pics : पाच टप्प्यांत महाराष्ट्र अनलॉक होणार, कसं ते पाहा एका क्लिकवर
राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना राज्य शासनाकडून महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.
ही अधिसूचना सोमवार म्हणजे 7 जूनपासून लागू होईल.
राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊ शिथिल करण्यात येत असला, तरीही यामध्ये स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्य अनलॉक करण्यासाठी 5 टप्पे तयार करण्यात आले आहेत.
अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील.
पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.
राज्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा म्हणजे किमान सध्याच्या घडीला कोणत्याही शहरात 20 टक्क्यांहून पॉझिटीव्हिटी रेट अधिक नाही.
त्यामुळं कोणतंही शहर हे पाचव्या टप्प्यामध्ये आलेलं नाही.
पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील.
दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा राहिल.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.