Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे खांब वाळवीने पोखरले
Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे अनेक खांब वाळवीने पोखरले आहेत. त्यामुळे देवस्थान समितीने तातडीची उपाययोजना सुरु केली आहे.
Continues below advertisement
Ambabai Mandir
Continues below advertisement
1/10
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या गरुड मंडपाचे अनेक खांब अडकमधून अर्धवट निखळल्याचे समोर आले होते.
2/10
त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हे खांब का निखळले याचा शोध घेतला होता.
3/10
गरुड मंडपाचे मुख्य आठ खांब वाळवीने पोखरले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
4/10
1839 पासून गरुड मंडप हा अंबाबाई मंदिराचा मुख्य भाग म्हणून ओळखला जातो.
5/10
त्यामुळे गरुड मंडपाला अनन्य साधारण महत्व आहे.
Continues below advertisement
6/10
पण हाच मंडप धोकादायक असल्याचं दिसून आलं आहे.
7/10
या खांबाच्या शेजारी असणारी फरशी काढल्यानंतर हे वास्तव समोर आलं आहे.
8/10
त्यामुळे देवस्थान समितीने तातडीची उपाययोजना सुरु केली आहे.
9/10
वाळवीने पोखरलेला काही भाग कट करुन त्याच्याखाली दगडी चौथराचा आधार देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे.
10/10
फरशी काढण्यात आल्यानंतर लाकडी खांब वाळवीने पोखरल्याचे समोर आले होते. त्यानंतर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
Published at : 20 Jan 2023 01:56 PM (IST)