Radhanagari Dam: राधानगरी धरणाचे अवघ्या सहा तासांच्या आत पाच स्वयंचलित दरवाजे उघडले; 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज (26 जुलै) राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत.
आतापर्यंत 5 ( 3, 4, 5, 6 व 7 ) स्वयंचलित दरवाजे उघडली आहेत.
धरणातून 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाचा क्रमांक सहा स्वयंचलित दरवाजा सकाळी सव्वा आठ वाजता उघडला.
सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी 5 वा स्वयंचलित दरवाजा उघडला.
दहा वाजून 3 मिनिटांनी 3 व दहा वाजून सहा मिनिटांनी 4 असे दरवाजे उघडले.
त्यानंतर दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सातव्या क्रमांकाचा दरवाजा उघडला
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात धरणाचे दरवाजे उघडले होते. यावर्षी जुलै अखेरलाच उघडले आहेत.
राधानगरी धरणातील पाणी कोल्हापुरात पोहोचण्यास 12 ते 15 तास लागतात.
त्यामुळे पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.