Operation Kaveri : सुदानमधल्या भारतीयांसाठी जीवनदान ठरलेलं आणि जगभरात चर्चा असलेलं 'ऑपरेशन कावेरी' आहे तरी काय?
आफ्रिका खंडात असलेल्या सुदानमध्ये युद्धपरिस्थिती आहे. अनेक परदेशी लोक त्या परिस्थितीत तिथे अडकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुदानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी भारताला सौदी अरेबिया देशाचीही मोठी मदत झाली.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन, महिला वैमानिकांनी त्यांच्या प्रियजनांना भारतात आणलं.
सुदानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी गटामध्ये भीषण चकमक सुरू आहे. गृहयुद्धाच्या परिस्थितीमुळे आता तिथे अडकलेल्या भारतीयांना ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून परत आणले जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, या युद्धात आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे आदेश दिले आहेत.
सुदानमधून सुमारे 3 हजार भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी चालवले जात आहे.
ऑपरेशन कावेरीमध्ये भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी महिला पायलट्सही मेहनत घेत आहेत.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. 26 एप्रिलला सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी दिल्लीत पोहोचली.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पाचवी तुकडी 297 प्रवाशांसह जेद्दाला रवाना झाली आहे.