Operation Sindoor: हल्ल्यापूर्वी आणि नंतर, जैशचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, पाकिस्तानची अवस्था दाखवणारे 10 फोटो!

Operation Sindoor: भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Operation Sindoor

1/10
भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
2/10
ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3/10
मुरिदकेच्या मरकझ तय्यबा मशिदीवरील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार झाल्याची माहिती मिळत आहे. फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे जबरदस्त कामगिरी केली. स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.
4/10
भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
5/10
जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टरचे आधीचे आणि भारताने केलेल्या हल्ल्यानंतरचे फोटो सध्या सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत.
6/10
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताने केलेल्या हल्ल्यावेळी बहावलपूरमध्ये 200 हून अधिक दहशतवादी होते, अशी माहिती मिळत आहे. तर मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी, मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी, कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी, सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी, गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी, भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी, चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी होते, अशी माहिती सांगितली जात आहे.
7/10
ऑपरेशन सिंदूरच्या या एअरस्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूर अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झाला. इतरही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत. यात मसुद अजहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
8/10
मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही ऑपरेशन सिंदूरद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे. मुरीदकेमधील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय होते, तेही उद्धवस्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबला प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यामुळे अजमल कसाब ज्या ठिकाणी घडला, तोच कॅम्प उद्धवस्त करण्यात आला आहे, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली आणि ती ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील दाखवले.
9/10
दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष्य साधलं.
10/10
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरल्याचे दिसून आले. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले.
Sponsored Links by Taboola