Hingoli: हिंगोलीत पेरूच्या बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड, झाडांना फळेच लागली नसल्याने उद्विग्न शेतकऱ्याने बाग केली नष्ट
फळबाग लागवडीमधून चांगला आर्थिक नफा होतो. या आशेने हिंगोली जिल्ह्यातील आंबा चोंढी येथील शेतकरी भारत भोसले आणि भगत भोसले यांनी स्वतःच्या शेतामध्ये चार वर्षा पूर्वी पोखरा योजनेअंतर्गत पेरूच्या बागेची लागवड केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु चार वर्ष होऊनही झाडाला फळे लागली नसल्याने शेतकऱ्यांनी पेरूच्या बागेवर कुऱ्हाड चालवत बाग जमीनदोस्त केली आहे
हिंगोली जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत भारत भोसले चार वर्षांपूर्वी पोखरा योजनेअंतर्गत त्यांनी स्वतःच्या दीड एकर क्षेत्रामध्ये पेरूच्या बागेची लागवड केली.
40 रुपये प्रति रोपटे याप्रमाणे त्यांनी एक हजार पेरूची रोपटे एका खाजगी नर्सरीमधून खरेदी केली आणि रोपट्यांची लागवड करून जोपासना केली.
बाग मोठी झाली परंतु आतापर्यंत पेरूच्या बागेला फळे लागत नसल्याने शेतकरी भोसले त्रस्त झाले आहेत.
या बागेला लहानाचं मोठं करण्यासाठी आतापर्यंत त्यांना जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च आला आहे.
कृषी विभागाला विनंती करूनही कृषी विभाग याची दखल घेत नसल्याने शेवटी कंटाळून या शेतकऱ्याने पेरूच्या बागेवर कुऱ्हाड चालवत पेरूची बागच जमीनदोस्त केली आहे.
या बागेबरोबर शेतकऱ्याचे स्वप्न सुद्धा आता जमीनदोस्त होत आहे.
पोखरा योजनेअंतर्गत लावलेल्या या बागेमुळे शेतकरी चांगलेच आर्थिक दिवाळखोरीत आले आहेत.
मागील चार वर्षात शेतातून येणारे उत्पन्न तर थांबलेच परंतु या बागेला जोपासताना शेतकऱ्याच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.