धक्कादायक! चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2022 08:33 PM (IST)
1
चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची घटना समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात स्मशानभूमीला जोडणाऱ्या पायवाटेवर पुलाची निर्मिती रखडली आहे.
3
सध्या जिल्ह्यातील विविध भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांनी पात्र सोडले आहे. याचा फटका अंत्ययात्रेच्या मार्गाला बसला.
4
जवळचा नाला फुगला आणि यातून वाट काढून नागरिकांना स्मशानभूमी गाठावी लागली. स्थानिकांनी गुडघाभर पाण्यातून वाट काढत तिरडी कशीबशी सांभाळत अंत्यसंस्कार केले.
5
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले.
6
त्यामुळे या पुलाची तातडीने निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे.