Bhandara : कर्जासाठीच्या जाचक अटींमुळे धान भरडाई खोळंबली , भंडाऱ्यातील 400 भात गिरण्या बंद

कर्जासाठीच्या जाचक अटींमुळे भंडारा जिल्ह्यातील राईस मिलधारक धान भरडाई करण्यास इच्छुक नाहीत.

Bhandara News

1/12
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाली आहे.
2/12
मात्र, कर्जासाठीच्या जाचक अटींमुळे भंडारा जिल्ह्यातील राईस मिलधारक धान भरडाई करण्यास इच्छुक नाहीत.
3/12
परिणामी जिल्ह्यातील सुमारे 400 भात गिरण्या बंद पडल्या आहेत.
4/12
विक्रमी धान खरेदी होऊनही मिलिंग गतिमान होत नसल्याचे दृश्य जिल्ह्यात बघायला मिळतंय
5/12
मजूर कामाविना बसले आहेत.
6/12
मिलिंगसाठी दिलेल्या जवळपास 403 क्विंटलच्या प्रति लॉटसाठी गिरणी धारकांना 2,400 रुपये देण्यात आले
7/12
9 लाख 67 हजार 200 नुसार बँक गॅरंटी अनिवार्य आहे.
8/12
प्रतिक्विंटल 67 किलो तांदूळ देण्याची अटही घातली आहे.
9/12
मिलर्स या अटी पूर्ण करू शकत नाहीत, आतापर्यंत जिल्ह्यातील 400 पैकी केवळ 69 गिरणीधारकांनी बँक हमीपत्र सादर केले आहे.
10/12
त्यामुळे जिल्ह्यात 37 लाख 10 हजार 45 क्विंटल खरेदीच्या तुलनेत आतापर्यंत गिरणी धारकांनी 1 लाख 95 हजार 511 क्विंटल धान जमा करून केवळ 17 हजार 462 क्विंटल तांदूळ जमा केला आहे.
11/12
शेतकऱ्यांसमोर सातत्यानं नवनवीन संकट येत असतात.
12/12
संकटावर मात करुन शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत.
Sponsored Links by Taboola