Premanand Maharaj: योग्य पती हवा आहे? प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले 'हे' उपाय करा...
Premanand Maharaj: भारतीय संतांमध्ये प्रेमानंद महाराज यांचे नाव आदराने आणि श्रद्धेने घेतले जाते. त्यांच्या शिकवणी आणि प्रवचनांमुळे लोकांना योग्य मार्ग सापडतो.
Continues below advertisement
Premanand Maharaj
Continues below advertisement
1/7
महाराजांचा विश्वास आहे की देवाची कृपा असेल, तर जीवनात सुख, शांती आणि प्रेम प्राप्त होते. जर महिलांना मनासारखा पती हवा असेल, तर काही विशेष उपाय करणं गरजेचं आहे असं प्रेमानंद महाराज म्हणतात.
2/7
एका महिलेने महाराजांना विचारले की तिच्या कुटुंबाला तिचे लग्न करायचे आहे. पण, तिला तिची देवावरची श्रद्धा जपणारा आणि भगवान कृष्णवरील प्रेम समजून घेणारा नवरा हवा आहे.
3/7
तिने असेही सांगितले की तिला तिच्याइतकंच धार्मिक आणि श्रद्धाळू व्यक्तीशी लग्न करायचे आहे.
4/7
महाराजांनी तिचा प्रश्न काळजीपूर्वक ऐकला आणि त्याचे उत्तर अतिशय सोप्या शब्दांत दिले. त्यांनी सांगितले, “लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात. आपल्या वाट्याला योग्य व्यक्ती येतेच.”
5/7
परंतु जर एखाद्याला आपल्या पसंतीचा जोडीदार हवा असेल, तर काही विशेष पावले उचलणं गरजेचं आहे. महाराजांनी सल्ला दिला की उपवास करा आणि विशेषतः भगवान शंकराची पूजा आणि प्रार्थना करा.
Continues below advertisement
6/7
या प्रथेमुळे देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. भक्ताला असा जोडीदार देतात, जो सदैव त्यांची काळजी घेईल आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आणेल.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 22 Oct 2025 01:08 PM (IST)