'हे' आहेत दिवाळीतील सर्वात धोकादायक फटाके; कॅन्सरचा गंभीर इशारा!

दिवाळीतील नाग गोळी फटाके विषारी रसायनांमुळे धूर सोडतात, ज्यामुळे कॅन्सर, फुफ्फुसांचे नुकसान, दमा, ऍलर्जी आणि लहान मुलांसाठी अधिक धोका निर्माण होतो.

Continues below advertisement

Health Tips

Continues below advertisement
1/9
दिवाळी हा आनंदाचा सण आहे. लोक दिवे लावून, मिठाई खाऊन आणि काहीजण फटाके फोडून तो साजरा करतात.
2/9
पण फटाके आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असतात. त्यातले नाग गोळी हा फटका सर्वात धोकादायक आहेत, कारण ते कॅन्सरचा धोका वाढवतात.
3/9
आता प्रश्न असा आहे कि , नाग गोळी किती धोकादायक आहे? तो छोटा फटाका असतो. पेटवल्यावर सापासारखा पसरतो आणि धूर सोडतो. तो आवाज करत नाही, पण त्याचा धूरच सर्व आजारांचे कारण ठरतो.
4/9
नाग गोळी नायट्रेट, सल्फर, जड धातू आणि कार्बनयुक्त रसायनांपासून बनवले जातात. पेटवल्यावर ते नायट्रिक ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि जड धातू असलेला विषारी धूर सोडतात.
5/9
यामुळे अनेक समस्या होतात. विषारी रसायने शरीरात साचून कॅन्सरचा धोका वाढवतात. धूर फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो आणि दमा, ब्राँकायटिस, ऍलर्जी वाढवतो. तसेच डोळ्यांना जळजळ, पाणी येणे आणि त्वचेवर अ‍ॅलर्जी होऊ शकते.
Continues below advertisement
6/9
नाग गोळी हा फटका लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
7/9
फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरसारखी रसायने असतात. ती श्वसनाचे विकार आणि फुफ्फुसांचे नुकसान करू शकतात.
8/9
कोळसा मायग्रेन आणि कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. स्ट्रॉन्टियम नायट्रेटही कर्करोग वाढवतो. फटाक्यांमध्ये बेरियम, तांबे आणि परक्लोरेटसारखी रसायनेही असतात.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola