Health Care: पावसाळ्यात पाणी पिताना घ्या 'ही' काळजी; अन्यथा उद्भवतील आजार

Monsoon Health Care: पावसाळा म्हटलं की अनेक आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात अनेक वेळा पाणी गढूळ येतं, त्यामळे पिण्याच्या पाण्याची खास काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स पाहूया.

Drinking Water

1/6
पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचं आहे.
2/6
स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीच्या गाळणीने पाणी गाळून घेतलं पाहिजे. पावसाळ्यात नळातून येणारं पाणी अनेक वेळा गढूळ येतं, त्यामुळे ते स्वच्छ करुन पिणं गरजेचं असतं.
3/6
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं. पाणी उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होतं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेलं पाणी प्यावं. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.
4/6
पावसाळ्यात तुरटी फिरवून पाणी शुद्ध करावं. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं.मात्र हा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने पाणी गाळून आणि उकळूनच प्यावं.
5/6
पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा. पिण्याचं पाणी स्वच्छ असलं तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकूनच ते पाणी प्यावं.
6/6
आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चांगलं असतं. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावं. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.
Sponsored Links by Taboola