Health Tips: रोज कोणतेही एक फळ खाण्याची सवय लावा, अनेक गंभीर आजार दूर होतील, जाणून घ्या कसे?
निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज फळांचे सेवन केले पाहिजे. बरेच दिवसांच्या अंतराने फळे खाणे टाळले पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही जण पाणी कमी पितात आणि शरिराला आवश्यक असणारी पोषक तत्व गमावतात. गमावलेल्या पोषक तत्वांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी फळे खाणे आवश्यक आहे. तुम्हाला फळांमधून भरपूर फायबर मिळतं, जे पचन प्रक्रियेला गती देण्यासोबतच पोटाची कार्ये सुधारण्याचे काम करते. इतकंच नाही तर बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या समस्यांपासून बचाव करण्यातही फळे उपयुक्त आहेत.
तुमचे वजन कमी करण्यासाठी देखील फळे फायदेशीर ठरतात. कारण, कोणतेही फळ खाल्ल्याने बाहेर पडणारे अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स शरीरात चरबी आणि ट्रायग्लिसराइड्स साठून राहण्यापासून रोखतात.
व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम शरीरातून नष्ट होऊ शकते. यामुळेच प्रत्येकाने रोज किमान एक फळ खाणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता दूर होण्यास मदत होते आणि बहु-पोषक घटकांचे प्रमाण वाढते.
ज्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर असतात, ते तुमच्या शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. ही फळे शरीरातील सर्व अवयवांना डिटॉक्स करतात. यकृत, फुफ्फुसे, आतडे आणि किडनी यांसारखे शरीरातील आवश्यक अवयव निरोगी ठेवतात.