Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन
प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे आज (7 एप्रिल) मुंबई येथे निधन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवयाच्या 82 व्या वर्षी माया गोविंद यांनी अखेरचा श्वास घेतला.
माया यांनी 350 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधील गाणी त्यांनी लिहिली होती.
माया गोविंद यांच्या मुलानं म्हणजेच अजय गोविंद यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, माया गोविंद यांचे निधन आज सकाळी 9.30 वाजता जुहू येथील त्यांच्या घरी झाले.
अजय गोविंद यांनी सांगितले, 'गेल्या चार महिन्यामध्ये दोन वेळा माया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण रुग्णालयात योग्य पद्धतीन उपचार होत नसल्यानं माया गोविंदा यांच्यावर घरीच उपचार सुरू केले.'
आरोप, जलते बदन, सावन को आने दो, बेकाबू, दमन, टक्कर, पायल की झंकार, बाल ब्रह्मचारी, आर या पार, गर्व, लाल बादशाह, बांवरी हमेशा, चाहत, ईमानदार, तोहफा मोहब्बत का, अनमोल, याराना, दलाल, गज गामिनी, गंगा की कसम, हम तुम्हारे है सनम यांसारख्या हिट चित्रपटांमधील गाणी माया यांनी लिहिली आहेत.
माया गोविंद यांचा जन्म 1940 मध्ये लखनऊ येथे झाला.
1972 मध्ये त्यांनी संगीत क्षेत्रातील त्यांच्या करिअरला सुरूवात केली.