PM Kisan : शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा, 2000 रुपये कधी खात्यात येणार? त्यापूर्वी ई-केवायसी कशी पूर्ण करायची?
PM Kisan E KYC : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान निधीची रक्कम मिळवण्यासाठी ईकेवायसी करणं आवश्यक आहे.
पीएम किसान सन्मान निधी
1/5
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी 20 व्या हप्त्याचे 2000 याची वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. मात्र, हे 2000 रुपये विना अडथळा मिळवायचे असतील तर ई केवायसी करणं आवश्यक आहे.
2/5
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. योजनेच्या नियमानुसार चार महिन्यांच्या कालावधीनंतर पीएम किसानचा हप्ता दिला जातो.
3/5
पीएम किसानचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात आला होता. तर,ऑक्टोबर 2024 मध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता देण्यात आला होता. पीएम किसान सन्माम निधीच्या हप्त्याचं वितरण विविध राज्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करुन केलं जातं. 18 वा हप्ता महाराष्ट्रातील वाशिममध्ये कार्यक्रम घेऊन तर 19 वा हप्ता बिहार राज्यात कार्यक्रम आयोजित करुन दिला गेला होता.
4/5
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा म्हणून ई केवायसी, जमीन पडताळणी आणि बँक आणि आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आलं आहे.
5/5
शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर भेट देऊन किंवा मोबाईल अॅपवरुन ई केवायसी प्रक्रिया करु शकतात. याशिवाय नागरी सुविधा केंद्रावर देखील ई केवायसी पूर्ण करता येईल. पीएम किसानच्या वेबसाईटला भेट द्या, तिथं ई केवायसी पर्यायावर क्लिक करा, आधार क्रमांक नोंदवा त्यानंतर ओटीपी क्रमांक आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येईल. तो वेबसाईटवर नोंदवल्यास ई केवायसी पूर्ण होईल.
Published at : 21 Jun 2025 05:26 PM (IST)