Chanakya Niti: 'या' दोन गोष्टींना घाबरत असाल, तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही!
Chanakya Niti: कितीही प्रयत्न केले तरी अपयशाची कारणे स्वतःच्या चुका असतात चाणक्य नीतीनुसार संयम, ज्ञान, वेळेचे व्यवस्थापन आणि योग्य नियोजन आवश्यक आहे.
Continues below advertisement
Chanakya Niti
Continues below advertisement
1/8
आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला यश मिळत नाही अशी तक्रार अनेकदा लोक करताना दिसतात. पण, नकळत त्यांच्याकडून अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे अपयशाचा सामना करावा लागतो. आणि यशापासून ते लोक दूर होतात. चाणाक्य नितीत याच चुका न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2/8
आयुष्यात या दोन गोष्टी करण्यावाचून जो कोणी घाबरेल त्याला आयुष्यात कधीच यश मिळत नाही असं चाणाक्य नितीत स्पष्ट सांगितलं आहे.
3/8
यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे, जी व्यक्ती बदलास घाबरत असेल, काही नवीन करण्याची इच्छा नसेल अशा लोकांना कधीच यश मिळत नाही. चाणाक्य नितीत बदल हा प्रकृतीचा नियम म्हणून स्वीकारण्यात आला आहे.
4/8
पुढे चाणाक्य सांगतात की, वेळ आणि परिस्थिती कधीच सारखी नसते. जर तुम्ही बदलाचा स्वीकार केला तरच तुमचं यश निश्चित आहे. जो कोणी व्यक्ती बदलाचा स्वीकार करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो.
5/8
आचार्य चाणाक्यांच्या मते, दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती संघर्षाला घाबरत असेल ती व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही. चाणाक्य नितीत संघर्षालाच यशाचं मुख्य कारण मानण्यात आलं आहे.
Continues below advertisement
6/8
चाणाक्यांनी सांगितलेल्या या तत्त्वात, संघर्षातून आपल्याला धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वास मिळतो. संघर्षातून व्यक्तीचं चरित्र कळतं.
7/8
चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जर तुम्ही या दोन्ही तत्त्वांचं पालन केलंत तर आयुष्यात तुम्ही कधीच अपयशी होणार नाही.
8/8
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 25 Oct 2025 01:55 PM (IST)