Astro Tips: वाईट काळ सुरू होण्यापूर्वी मिळतात 'हे' संकेत; जरा जपुनच राहा, नाहीतर...
चाणक्यनितीनुसार, जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर याचा अर्थ घरातील बरकत जाऊन तुमची वाईट वेळ सुरू होणार आहे, हे समजून जा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआचार्य चाणक्य सांगतात की, घरातील तुळशीचं रोप अचानक सुकून गेलं, तर ही गोष्ट शुभ मानली जात नाही. तुळशीचं सुकणं तुमच्या वाईट वेळचा निरोप आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही.
आचार्य चाणक्यांनुसार, ज्या घरांमध्ये तुळशीचं रोप अचानक सुकायला लागतं, त्या घरात अनेक आर्थिक अडचणी, भांडणं यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात.
आचार्य चाणक्यांनी सांगितल्यानुसार, घरात ठेवलेलं तुळशीचं रोप सुकणं हे काही आगामी आर्थिक समस्येचं लक्षण देखील असू शकतं.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर घरामध्ये अचानक संकटं वाढली आणि घरातील सदस्यांमधील प्रेम कमी होऊन त्याचं रुपांतर भांडणांमध्ये होत असेल तर ते अशुभ लक्षण आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, घरातील वाढती संकटं, भांडणं वाढणं म्हणजे, समजून जा की, कोणतं ना कोणतं मोठं संकट तुमची वाट पाहातंय.
त्यामुळे तुमच्या घरात विनाकारण वाद होत असतील तर ते शांततेनं सोडवा आणि वाद वाढवू नका.
घरातील आरसा अचानक फुटला तर ते देखील अशुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा आहे की, संकट तुमच्या दारापर्यंत येऊन उभं राहिलं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)