Photo : धुळ्यात मिरचीला दराचा 'तडका'
मिरचीच्या दरात वाढ झाल्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, बहुतांशी शेतकऱ्यांच्या मिरची पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळं पिकांचं नकसान झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळ्यात अतिवृष्टीमुळं मिरीचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं उत्पादन घटलं आहे. उत्पादनात घट झाल्यानं मिरचीच्या (Chili) दरात मोठी वाढ झाली आहे.
धुळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा फटका लाल मिरचीला बसला आहे. उत्पादनात घट झाल्यामुळं मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळं मिरचीला महागाईचा तडका बसला आहे.
धुळ्यातील दोंडाईच्या बाजार समितीत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरचीची आवक होत आहे. या मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं फायदा होत आहे.
एकीकडे लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले असताना दुसरीकडं मागणी वाढल्यानं लाल मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. याचा फायदा ज्या शेतकऱ्यांकडे मिरची आले त्यांना होत आहे.
रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे.
धुळे जिल्ह्यात दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार समजले जाते. या ठिकाणी विविध ठिकाणाहून मिरचीची आवक होते.
दोंडाईच्या परिसरात देखील मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, या मिरचीवर सध्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचे उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला होता. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. याचा मिरची पिकालाही मोठा फटका बसला आहे.
धुळ्यात मिरचीला महागाईचा तडका बसला आहे. रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे.