दुष्काळाच्या झळा, जालना जिल्ह्यात फळबागांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड
अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा जाणवत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Fruit orchards affected due to drought in Jalna
1/10
सध्या राज्यात उन्हाचा पारा (Heat) चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा (temperature) पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे.
2/10
अनेक ठिकाणी पाणीटंचाई (Water Crisis) निर्माण झाली आहे. नागरिकांबरोबर जनावरांच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय.
3/10
दुष्काळामुळे जालना जिल्ह्यातील 3500 हेक्टरवरील फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. तर 2500 हेक्टरवरील मोसंबीच्या बागा जळाल्या आहेत.
4/10
शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं करपू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
5/10
नेक शेतकरी पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. दुष्काळामुळं या फळबागा करपून गेल्याचं भीषण वास्तव शेत शिवारात पाहायला मिळतेय.
6/10
जालना कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या अहवालातुन ही माहिती समोर आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्यात आला आहे.
7/10
जालना जिल्ह्यात भीषण अशा दुष्काळाच्या झळा बसत असून, जवळपास 3500 हेक्टर वरील फळबागा नष्ट झाल्या असून त्या पैकी अडीच हजार हेक्टर मोसंबी बागा जळाल्याच समोर आलंय.
8/10
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी अपेक्षीत प्रमाणात पाऊस झाला नव्हता. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता.
9/10
धरण, तलाव, नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा नव्हता. जेवढा साठा होता, तेवढा साठा आता संपत आला आहे. अनेक ठिकाणी धरणं, नदी नाले तलाव कोरडेठाख पडले आहेत.
10/10
पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तसेच पाणीच नसल्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Published at : 01 Jun 2024 03:27 PM (IST)