यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे यवतमाळ -नागपूर  महामार्गावरील (Yavatmal Nagpur Highway) चापरडा गावाजवळ हा अपघात (Road Accident) झाला. या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. हे सर्वजण पंजाबवरुन आले होते. ते नांदेड येथील गुरुद्वारामध्ये चालले होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. इनोव्हा कारच्या बोनेटचा भाग जोरात धडक झाल्यामुळे ट्रकच्या मागच्या भागात शिरला. त्यामुळे बोनेटचा पत्रा उखडला गेला अन् पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. या गाडीत एअरबॅग्ज नव्हत्या. त्यामुळे चालकासह मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली.  या जोरदार धडकेत इनोव्हा कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे.


समृद्धी महामार्गावर भीषण अपघात


गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गावर जालना येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये  सहाजणांचा मृत्यू झाला होत तर चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. एक कार उलट्या दिशेने आल्यामुळे दोन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. मृतामंध्ये मुंबईच्या मालाड परिसरात राहणाऱ्या तिघांचा समावेश होता. मृतांमध्ये फय्याज शकील मन्सुरी, फैजल शकील मन्सुरी, अल्थमेश  मन्सुरी, प्रदिप लक्ष्मण मिसाळ, संदीप माणिकराव बुधवंत आणि विलास सुदान कायंदे यांचा समावेश होता. 


आणखी वाचा


पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं


नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; 2 चिमुकल्यांसह कुटुंबांवर दु:खाचा डोंगर