भारत दहशतवादाविरोधात इंग्लंडसोबत : पंतप्रधान मोदी
एबीपी माझा वेब टीम | 23 Mar 2017 08:19 AM (IST)

नवी दिल्ली : इंग्लंडच्या संसदेबाहेर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसासह चार जणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले आहेत. तर हल्लेखोराचाही खात्मा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून भारत इंग्लंडसोबत असल्याचं म्हटलं आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत इंग्लंडच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. हल्लेखोरांनी संसदेबाहेर एका पोलीस अधिकाऱ्याला चाकूनं भोसकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी दोन हल्लेखारांना कंठस्नान घातलं. गोळीबारानंतर संसदेची इमारत बंद करण्यात आली.