जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, मुलींच्या या मृत्यूमुळं संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिक मीडियाच्या मते, 400 जणांची क्षमता असलेल्या या कॅम्पमध्ये चारशेहून अधिक जण राहत होते. ग्वाटेमालातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.