Vidhan Parishad Election Result : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचेही मैदान जिंकले. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. भाजपच्या या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाट आहे. राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी ठरली. या विजयानंतर सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, मॅन ऑफ दी सिरिज, बाहुबली असे म्हणत नेटकरी फडणवीसांवर कौतुकांचा वर्षाव करत आहेत... 

पाहा नेटकरी काय म्हणाले?

 

विजयानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजयी झाला. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मते घेतली होती. आता आम्ही 134 मते घेतली आहेत. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही, हे मी पहिल्यापासून सांगत होतो. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणूनच आमच्या पाचव्या उमदवाराला विजयी केले. पाचव्या उमदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते. तरिही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमदवारापेक्षा जास्त मते घेतली. उर्वरित चारही उमदवाराने जास्त मते घेतली. त्यामुळेच प्रचंड मोठा विजय झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी अडचणीत असतानाही त्यांनी विजयाला हातभार लावला, त्यांचेही फडणवीस यांनी आभार मानला. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यापद्धतीने देशात परिवर्तित करत आहेत. भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. या निवडणुकीनं महाराष्ट्रात परिवर्तणाची नवी नांदी पाहायला मिळतेय. राज्यातील सरकारच्या विरोधातील असंतोष या निवडणुकीतून पुन्हा एकदा बाहेर आलाय. यापुढे आमचा संघर्ष असाच सुरु राहिल, आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष संपेल,  असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.