मुंबई : अॅपल या जगप्रसिद्ध मोबाईल कंपनीची भारतातील बाजारपेठ वाढली आहे. त्यामुळे लवकरच भारतात अॅपल स्टोअर सुरू करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

 

गेल्या काही महिन्यात अॅपलचे जगभरातील ग्राहक कमी झाले झाले असले करी भारतात मात्र अॅपलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे.

 

अॅपल आयफोनच्या विक्रीत 27 टक्के घसरण झाली आहे. ही घसरण तब्बल 7.8 अब्ज डॉलर इतकी होती. 2016 मध्ये 4.04 कोटी आयफोनची विक्री झाली आहे. तर 2015 मध्ये याच काळात 4.75 कोटी आयफोनची विक्री झाली होती.

 

गेल्या वर्षभरात भारतात अॅपल आयफोनचा खप 51 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कंपनीने अॅपल स्टोअर भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी दिली.

 

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालामध्ये भारताची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या तिमाहीमध्ये 51 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद केले आहे. भारतात अॅपल स्टोअर सुरु करुन भारतातील बाजारपेठ वाढवण्याचा प्रयत्न कंपनी करणार असल्याचे कुक म्हणाले.